शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ अभियान

By admin | Updated: October 8, 2014 23:29 IST

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अभियान राज्यातील प्रत्येक शाळा,

शाळांचा सहभाग : विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनासुरेंद्र डाफ - आर्वी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अभियान राज्यातील प्रत्येक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात ३१ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळेत हे उपक्रम राबविण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना केल्या आहे.‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक, शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इतरांना स्वच्छ गाव आरोग्य विषयक नाविण्यपूर्ण उपक्रमावी निवड व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांप्रती शालेय व विद्यालयीन शिक्षणाची भूमिका व त्याचा विद्यार्थ्यांच्या विकासगुणाचा दर्जा कायम राखून आदर्श कलागुणांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात यावे, यातून विद्यार्थ्यांना पोषक व उत्साहवर्धक तसेच शालेय उपस्थितीत विद्यार्थ्यांची वाढ होईल हा शालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून दर्जेदार शिक्षण घेण्यामध्ये या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होईल हा हेतू या स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियाना समोर ठेवण्यात आला आहे. या अभियानात शालेय स्तरावर दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात आरोग्य विषयक शपथ, शिक्षणाची पालखी, स्वच्छता ज्ञानयात्रा परिक्रमा, स्वच्छतेवर विद्यार्थ्यांची भाषणे शालेय परिसर स्वच्छता, निबंध स्पर्धा, मेळावे, शाळामध्ये स्वच्छतागृहे, पाण्याची उपलब्धता, मेळावे, निबंध स्पर्धा, स्थानीक कलाकारांच्या माध्यमातून जनजागृती, शैक्षणिक प्रदर्शन, कार्यालयीन स्वच्छता, हँडवॉश दिन आदी बाबींचा ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या अभियानात समावेश करण्यात आला आहे. यामुळे शाळांशाळांत यानुसार काम सुरू आहेत.