शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ अभियान

By admin | Updated: October 8, 2014 23:29 IST

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अभियान राज्यातील प्रत्येक शाळा,

शाळांचा सहभाग : विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनासुरेंद्र डाफ - आर्वी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अभियान राज्यातील प्रत्येक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात ३१ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळेत हे उपक्रम राबविण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना केल्या आहे.‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक, शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इतरांना स्वच्छ गाव आरोग्य विषयक नाविण्यपूर्ण उपक्रमावी निवड व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांप्रती शालेय व विद्यालयीन शिक्षणाची भूमिका व त्याचा विद्यार्थ्यांच्या विकासगुणाचा दर्जा कायम राखून आदर्श कलागुणांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात यावे, यातून विद्यार्थ्यांना पोषक व उत्साहवर्धक तसेच शालेय उपस्थितीत विद्यार्थ्यांची वाढ होईल हा शालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून दर्जेदार शिक्षण घेण्यामध्ये या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होईल हा हेतू या स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियाना समोर ठेवण्यात आला आहे. या अभियानात शालेय स्तरावर दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात आरोग्य विषयक शपथ, शिक्षणाची पालखी, स्वच्छता ज्ञानयात्रा परिक्रमा, स्वच्छतेवर विद्यार्थ्यांची भाषणे शालेय परिसर स्वच्छता, निबंध स्पर्धा, मेळावे, शाळामध्ये स्वच्छतागृहे, पाण्याची उपलब्धता, मेळावे, निबंध स्पर्धा, स्थानीक कलाकारांच्या माध्यमातून जनजागृती, शैक्षणिक प्रदर्शन, कार्यालयीन स्वच्छता, हँडवॉश दिन आदी बाबींचा ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या अभियानात समावेश करण्यात आला आहे. यामुळे शाळांशाळांत यानुसार काम सुरू आहेत.