शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वर्षाकाठी पालिकेला सरासरी ६.१६ लाखांचा सफाई कर

By admin | Updated: June 13, 2014 00:21 IST

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता पालिकेच्यावतीने शहरवासीयांकडून सफाई कर वसूल केले जाते. या करापोटी पालिकेला वर्षाकाठी सरासरी ६.१६ लाख रुपये शहरातून मिळतात. असे असले तरी शहरातील

रूपेश खैरी - वर्धाशहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता पालिकेच्यावतीने शहरवासीयांकडून सफाई कर वसूल केले जाते. या करापोटी पालिकेला वर्षाकाठी सरासरी ६.१६ लाख रुपये शहरातून मिळतात. असे असले तरी शहरातील रस्त्यारस्त्यावर कचऱ्यांची आरास दिसत असल्याने स्वछतेचे वाभाडे निघत आहे.

शहरातील नागरिकांना मूलभूत सविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. ही जबाबदारी पार पाडण्याकरिता पालिकेला आवश्यक असलेली रक्कम मिळविण्याकरिता शहरवासीयांकडून कर वसूल करण्यात येतो. हा कर वसूल करताना शासनाच्या सूचनेनुसार विविध शाखा तयार करून त्या माध्यमातून कर वसूल केला जात आहे. पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असलेल्या करापैकी बरीच रक्कम पालिकेला मिळत नसून ती थेट शासनाच्या तिजोरीत जात असल्याचे समोर आले आहे; मात्र सफाई कराचे तसे नाही. वसूल झालेल्या सफाई करावर पालिकेचा अधिकार आहे.

शहरवासीयांकडून वर्षाकाठी वसूल होत असलेल्या कराच्या रकमेतून शहरात स्वच्ठता ठेवण्यात येत आहे. गत आठ वर्षांत शहरातून पालिकेच्यावतीने ४९ लाख ३१ हजार ३९० रुपयांचा कर वसूल करण्यात आला असल्याचे माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अधिकाराचा वापर करून समोर आणले आहे. एवढा कर वसूल करण्यात आला असला तरी पालिकेच्यावतीने स्वच्छतेच्या नावावर शहरवासीयांना कुठल्याही ठोस सुविधा दिल्या नसल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्यारस्त्याचर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यातून दुर्गंधी पसरत असून त्याचा विपरित परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय डासांचे प्रमाण वाढल्याने शहरात डेंग्यूची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पावसाळा तोंडावर आला आहे. शहरातील नाल्या कचऱ्याने तुुंबल्या आहेत. पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहे. ती शहरातील बाजार परिसरातच असून शहराच्या इतर भागात मात्र या मोहिमेचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागातील नाल्या अजूनही तुंबलेल्या स्थितीत असून त्या स्वच्छ करण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात या नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर त्याचे सोयरे सुतक पालिकेला नसल्याचे वास्तव असल्याचे चित्र आहे. वर्षाकाठी सहा लाखांचा कर देणाऱ्या वर्धा शहर वासींयाच्या माथी घरात पाणी जाण्याची वेळ आल्यास त्यांनी दिलेला हा कर त्यांच्या काय उपयोगाचा, असा प्रश्न पालिकेच्या कर वसुली पथकाला नागरिकांनी विचारल्यास आश्चर्य वाटू नये.