शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वर्षाकाठी पालिकेला सरासरी ६.१६ लाखांचा सफाई कर

By admin | Updated: June 13, 2014 00:21 IST

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता पालिकेच्यावतीने शहरवासीयांकडून सफाई कर वसूल केले जाते. या करापोटी पालिकेला वर्षाकाठी सरासरी ६.१६ लाख रुपये शहरातून मिळतात. असे असले तरी शहरातील

रूपेश खैरी - वर्धाशहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता पालिकेच्यावतीने शहरवासीयांकडून सफाई कर वसूल केले जाते. या करापोटी पालिकेला वर्षाकाठी सरासरी ६.१६ लाख रुपये शहरातून मिळतात. असे असले तरी शहरातील रस्त्यारस्त्यावर कचऱ्यांची आरास दिसत असल्याने स्वछतेचे वाभाडे निघत आहे.

शहरातील नागरिकांना मूलभूत सविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. ही जबाबदारी पार पाडण्याकरिता पालिकेला आवश्यक असलेली रक्कम मिळविण्याकरिता शहरवासीयांकडून कर वसूल करण्यात येतो. हा कर वसूल करताना शासनाच्या सूचनेनुसार विविध शाखा तयार करून त्या माध्यमातून कर वसूल केला जात आहे. पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असलेल्या करापैकी बरीच रक्कम पालिकेला मिळत नसून ती थेट शासनाच्या तिजोरीत जात असल्याचे समोर आले आहे; मात्र सफाई कराचे तसे नाही. वसूल झालेल्या सफाई करावर पालिकेचा अधिकार आहे.

शहरवासीयांकडून वर्षाकाठी वसूल होत असलेल्या कराच्या रकमेतून शहरात स्वच्ठता ठेवण्यात येत आहे. गत आठ वर्षांत शहरातून पालिकेच्यावतीने ४९ लाख ३१ हजार ३९० रुपयांचा कर वसूल करण्यात आला असल्याचे माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अधिकाराचा वापर करून समोर आणले आहे. एवढा कर वसूल करण्यात आला असला तरी पालिकेच्यावतीने स्वच्छतेच्या नावावर शहरवासीयांना कुठल्याही ठोस सुविधा दिल्या नसल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्यारस्त्याचर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यातून दुर्गंधी पसरत असून त्याचा विपरित परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय डासांचे प्रमाण वाढल्याने शहरात डेंग्यूची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पावसाळा तोंडावर आला आहे. शहरातील नाल्या कचऱ्याने तुुंबल्या आहेत. पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहे. ती शहरातील बाजार परिसरातच असून शहराच्या इतर भागात मात्र या मोहिमेचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागातील नाल्या अजूनही तुंबलेल्या स्थितीत असून त्या स्वच्छ करण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात या नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर त्याचे सोयरे सुतक पालिकेला नसल्याचे वास्तव असल्याचे चित्र आहे. वर्षाकाठी सहा लाखांचा कर देणाऱ्या वर्धा शहर वासींयाच्या माथी घरात पाणी जाण्याची वेळ आल्यास त्यांनी दिलेला हा कर त्यांच्या काय उपयोगाचा, असा प्रश्न पालिकेच्या कर वसुली पथकाला नागरिकांनी विचारल्यास आश्चर्य वाटू नये.