शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सभापतींनी घेतला कापूस व्यापाऱ्यांचा ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:45 IST

बाजार समितीच्या यार्डमध्ये लिलाव झाल्यानंतर ठरलेल्या भावावर कायम न राहता प्रती क्विंटल ५०० रुपयांपर्यंत दर कमी दिले जात आहे. व्यापाऱ्यांच्या जीनिंगमध्ये गाडी खाली करताना कापसाच्या गुणवत्तेचे कारण सांगून नागविले जात आहे.

ठळक मुद्देगुणवत्तेवरून ५०० रुपयांपर्यंत पाडतात भाव

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : बाजार समितीच्या यार्डमध्ये लिलाव झाल्यानंतर ठरलेल्या भावावर कायम न राहता प्रती क्विंटल ५०० रुपयांपर्यंत दर कमी दिले जात आहे. व्यापाऱ्यांच्या जीनिंगमध्ये गाडी खाली करताना कापसाच्या गुणवत्तेचे कारण सांगून नागविले जात आहे. याबाबत तक्रारी मिळताच कृउबास सभापती मनोहर खडसे यांनी लिलाव थांबवून तब्बल तीन तास संबंधित व्यापाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला.कापसाच्या गुणवत्तेवरून एकदा ठरलेला भाव व्यापाऱ्यांना परस्पर कमी करता येणार नाही. अशा कापूस गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करून भाव कमी-अधिक करण्याचा अधिकार बाजार समितीकडे राहील, असे निर्देशही सभापती खडसे यांनी खासगी व्यापाºयांना बैठकीत दिले.कापसाची मुख्य बाजारपेठ म्हणून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. येथील यार्डमध्ये भावबाजीतील तफावतीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांत संंभ्रम निर्माण झाला होता. लिलावाच्या वेळी वेगळा भाव तसेच जीनिंगमध्ये गाडी खाली करताना गुणवत्तेचे कारण सांगून कमी भाव दिला जात होता. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड होती. या बाजार समितीत आजपर्यंत ३.७५ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात केवळ १५ हजार क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने तर उर्वरित खरेदी खासगी व्यापाऱ्यांनी केली. सीसीआयची खरेदी असल्याने या बाजारपेठेत बऱ्यापैकी भाव मिळत असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी विविध कारणे देत ठरलेला भाव कमी करण्याचा प्रकार होत आहे. या बाजारपेठेची पत कायम ठेवण्यासाठी सीसीआयने खरेदीचा टक्का वाढवून अधिकाधिक कापूस खरेदी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.