शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मातीतील खेळाला संघटनेच्या वादाचा खोडा

By admin | Updated: July 15, 2014 00:07 IST

अस्सल मातीतील खेळ म्हणून ओळख असलेल्या कबड्डीने एकेकळी लोकप्रियतेचे सवौच्च शिखर गाठले होते. क्रिकेटची वाढती रसिकता या खेळाला मारक ठरली असली तरी संघटनेतील वाद खेळाच्या प्रसाराला

श्रेया केने - वर्धाअस्सल मातीतील खेळ म्हणून ओळख असलेल्या कबड्डीने एकेकळी लोकप्रियतेचे सवौच्च शिखर गाठले होते. क्रिकेटची वाढती रसिकता या खेळाला मारक ठरली असली तरी संघटनेतील वाद खेळाच्या प्रसाराला आणि प्रचारातील मुख्य अडसर बनत आहे. जिल्हा आणि विदर्भ संघटनेतील वादामुळे खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. या वादामुळे संघटनेवर ‘स्टे’ येण्याची टांगती तलवार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.कबड्डी या खेळाला गौरवशाली परंपरा आहे. जिल्ह्याने ही ७० आणि ८० च्या दशकात सुवर्णकाळ अनुभवला आहे. काशीनाथ रिठे यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. यात अन्य खेळाडूंनीही भर घातली. एकेकाळी जिल्ह्यात ८० हून अधिक क्लब होते. आता ही आकडेवारी ४० पर्यंत आली आहे. ग्रामीण भागात आजही कबड्डीचा असलेले वलय तसूभरही ओसरले नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात तीन संघटना कार्यरत आहेत. विदर्भ संघटनेतील वाद २० वर्षांपासून प्रलंबित आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आहे. यावर शासनाने आणि क्रीडा संचनालयाने मध्यस्थीची भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गौरवशाली परंपरा-जिल्ह्याला या खेळात गौरवशाली परंपरा लाभली आहे. राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्याचा मानही मिळाला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद जिल्ह्याकडे होते. मात्र दिवसेंदिवस या खेळाकडील पे्रक्षक आणि खेळाडूंचा कल ओसरत आहे. -जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेतही दबदबा निर्माण केला. या हिंगणघाट येथील दिवंगत कबड्डीपटू काशीनाथ रिठे यांचा काळ हा जिल्ह्यातील कबड्डीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना प्रेक्षकांनी ‘बंगालचा टायगर’ अशी उपाधी बहाल केली होती. याशिवाय रणजितसिंग ठाकूर, किशोर पोफळी, विजय रिठे, विनोद बिरे, भीमराव ढोक, मुरली फाले या खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक केला. महिलांत सीमा दुबे, योगिनी निमसडे सह गुणवंत खेळाडूंनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विद्यापीठ संघात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. -जिल्ह्यातील खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळविता आला नसला तरी या खेळाच्या प्रकाराकरिता सुभाष पिसे यांना राज्य शासनाने शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.