शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गढूळ पाण्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:52 IST

शहराला पवनार पंप हाऊस येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. मागील दहा दिवसांपासून तिच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, हातपंपांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यातच सोमवारी शहरातील नळांना मातीमिश्रीत गढूळ पाणी आले. यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देफुटलेल्या जलवाहिनीचा फटका : शुद्धतेकडे लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला पवनार पंप हाऊस येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. मागील दहा दिवसांपासून तिच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, हातपंपांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यातच सोमवारी शहरातील नळांना मातीमिश्रीत गढूळ पाणी आले. यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे.तापनामाने ४५ अंशांचा आकडा पार केला असताना वातावरणातील बदलाने आजारी पडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शासकीय तसेच खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. यातच गढूळ पाणीपुरवठा करून नगर परिषद प्रशासनाने यात आणखी भर घातल्याचेच दिसून येत आहे. शहराला येळाकेळी व पवनार येथील पंप हाऊसवरून पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जवळपास ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. यामुळे ती जीर्ण झाली आहे. कित्येक वर्षांपासून मुख्य पाईपलाईन बदलण्यात आली नाही. पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या पंपावरव कोणतेही सुरक्षिततेचे उपाय केलेले दिसून येत नाही.पंपावरील साफसफाईचे तिनतेरा वाजले असून पाण्यात कधीही ब्लिचींग पावडर वा तुरटी टाकण्यात येत नाही. यामुळे अनेक दिवसांपासून शहरातील काही भागात गढूळ व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येते. याबाबत अनेकांकडून तक्रारीही केल्या जातात. आता पुन्हा फुटलेल्या पाईपलाईनमुळे गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाईपलाईन दुरूस्त केली असली तरी शुद्ध पाणी पुरवठा होईल, याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.मागील वर्षीही आरती चौकात फुटली होती पाईपलाईनशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवनार आणि येळाकेळी येथील पाईपलाईन ही ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. ही पाईपलाईन बदलण्याबाबत कधीही विचार झाला नाही. मागील वर्षी आरती चौकात ही पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा प्रभावित झाला होता. दरवर्षी नेमकी उन्हाळ्यातच पाईपलाईन फुटत असताना नगर परिषद कोणताही बोध घेत नसल्याचेच दिसून येते.बांधकामांवर बंदी लावणे अगत्याचेमुख्य जलवाहिनी फुटल्याने मागील दहा दिवसांपासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात असणाºया कुपनलिकांपैकी जवळपास ७० टक्के कुपनलिकांना पाणी नाही. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना शहरात बांधकामे धडाक्याने सुरू असल्याचे दिसते. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचेच दिसते. उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने बांधकामांवर बंदी लादावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.पर्यायी व्यवस्थेचा अभावदहा दिवसांपूर्वी पवनार येथील पंपहाऊसमधून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. यानंतर शहरात पाच दिवस पाणी पुरवठा होणार नाही, असे नगर परिषद प्रशासनाने जाहीर केले होते. ही पाईपलाईन दुरूस्त करण्यास पाच दिवसांचा कालावधी लागेल, हे माहिती असताना नगर परिषद प्रशासनाने पर्यायी व्यवस्था का करू नये, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.