शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गढूळ पाण्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:52 IST

शहराला पवनार पंप हाऊस येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. मागील दहा दिवसांपासून तिच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, हातपंपांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यातच सोमवारी शहरातील नळांना मातीमिश्रीत गढूळ पाणी आले. यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देफुटलेल्या जलवाहिनीचा फटका : शुद्धतेकडे लक्ष देणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला पवनार पंप हाऊस येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. मागील दहा दिवसांपासून तिच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, हातपंपांच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. यातच सोमवारी शहरातील नळांना मातीमिश्रीत गढूळ पाणी आले. यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे.तापनामाने ४५ अंशांचा आकडा पार केला असताना वातावरणातील बदलाने आजारी पडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. शासकीय तसेच खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. यातच गढूळ पाणीपुरवठा करून नगर परिषद प्रशासनाने यात आणखी भर घातल्याचेच दिसून येत आहे. शहराला येळाकेळी व पवनार येथील पंप हाऊसवरून पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जवळपास ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. यामुळे ती जीर्ण झाली आहे. कित्येक वर्षांपासून मुख्य पाईपलाईन बदलण्यात आली नाही. पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या पंपावरव कोणतेही सुरक्षिततेचे उपाय केलेले दिसून येत नाही.पंपावरील साफसफाईचे तिनतेरा वाजले असून पाण्यात कधीही ब्लिचींग पावडर वा तुरटी टाकण्यात येत नाही. यामुळे अनेक दिवसांपासून शहरातील काही भागात गढूळ व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येते. याबाबत अनेकांकडून तक्रारीही केल्या जातात. आता पुन्हा फुटलेल्या पाईपलाईनमुळे गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाईपलाईन दुरूस्त केली असली तरी शुद्ध पाणी पुरवठा होईल, याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.मागील वर्षीही आरती चौकात फुटली होती पाईपलाईनशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवनार आणि येळाकेळी येथील पाईपलाईन ही ५० वर्षांपेक्षा जुनी आहे. ही पाईपलाईन बदलण्याबाबत कधीही विचार झाला नाही. मागील वर्षी आरती चौकात ही पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा प्रभावित झाला होता. दरवर्षी नेमकी उन्हाळ्यातच पाईपलाईन फुटत असताना नगर परिषद कोणताही बोध घेत नसल्याचेच दिसून येते.बांधकामांवर बंदी लावणे अगत्याचेमुख्य जलवाहिनी फुटल्याने मागील दहा दिवसांपासून शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरात असणाºया कुपनलिकांपैकी जवळपास ७० टक्के कुपनलिकांना पाणी नाही. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना शहरात बांधकामे धडाक्याने सुरू असल्याचे दिसते. या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचेच दिसते. उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने बांधकामांवर बंदी लादावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.पर्यायी व्यवस्थेचा अभावदहा दिवसांपूर्वी पवनार येथील पंपहाऊसमधून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. यानंतर शहरात पाच दिवस पाणी पुरवठा होणार नाही, असे नगर परिषद प्रशासनाने जाहीर केले होते. ही पाईपलाईन दुरूस्त करण्यास पाच दिवसांचा कालावधी लागेल, हे माहिती असताना नगर परिषद प्रशासनाने पर्यायी व्यवस्था का करू नये, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.