शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शहरातील वाहतुकीचा फज्जा अडथळे दूर करणे गरजेचे

By admin | Updated: April 28, 2016 02:03 IST

वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

आर्वी शहर कृती समितीचे तहसीलदारांना निवेदनातून साकडेआर्वी : वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुकीचा फज्जा उडाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावे व वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी आर्वी शहर कृती समितीने केली आहे. याबाबत बुधवारी तहसीलदार मनोहर चव्हाण व पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांना निवेदनही सादर करण्यात आले.शहरातील शिवाजी चौक ते गांधी चौक या रहदारीच्या रस्त्यावर हातफेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, रस्ता अरूंद झाल्याने अपघात वाढले आहेत. विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय बाजपेयी व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयावर तहसील कार्यालयात चर्चा केली. अतिक्रमण हटविण्याबाबत संयुक्त निवेदनही देण्यात आले. शहरातील मुख्य रस्ता असलेला शिवाजी चौक ते गांधी चौकपर्यंतच्या वाहतुकीच्या रस्त्यावर फेरीवाले हातगाड्यांचे अतिक्रमण करीत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय अनियंत्रित शालेय अल्पवयीन मुले, मुली रहदारीच्या रस्त्यावर वाहने भरधाव चालवितात. अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याची परवानगी नसताना हा प्रकार घडत असल्याचे दिसते. गांधी चौक व शिवाजी चौकाच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांमुळे वाहतूक ठप्प होते. सामान्यांना पायी चालणेही कठीण होते. शिवाय हातगाडीधारक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने मोकाट गुरांचाही वावर वाढला आहे. यावर कार्यवाही करण्याची मागणी कृती समितीच्यावतीने करण्यात आली.शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी लायसन्स नसताना भरधाव वाहने चालवून अपघाताला कारणीभूत ठरतात. यावर त्वरित आवर घालावा, अल्पवयीन वाहनधारकांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली. यावेळी ठाणेदार शैलेश साळवी, तहसीलदार मनोहर चव्हाण, समितीचे प्रा. प्रशांत सव्वालाखे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद हिवाळे, नंदकिशोर थोरात, दादाराव गुल्हाणे, नगरसेवक संजय थोरात, विनय डोळे, प्रकाश गुल्हाणे, अजय करकमवार आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)