शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बाजारपेठेत सॅनिटायझर, मास्कची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, या विषाणूजन्य आजाराचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. दिवसातून किमान तीन ते चारवेळा आणि शक्य होईल तेव्हा हात स्वच्छ धुण्यासोबतच स्वच्छता बाळगण्याच्या सूचना आहेत. घाबरू नका, पण काळजी अवश्य घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा धसका । माल नसल्याने कंपन्यांकडून पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुणे आणि नागपूरमध्ये कोरोना विषाणूसंसंर्गित रुग्ण आढळून आले आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांकडून सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी केली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत बाजारपेठेत एकाही औषधविक्रेत्याकडे सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध नसून प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, या विषाणूजन्य आजाराचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. दिवसातून किमान तीन ते चारवेळा आणि शक्य होईल तेव्हा हात स्वच्छ धुण्यासोबतच स्वच्छता बाळगण्याच्या सूचना आहेत. घाबरू नका, पण काळजी अवश्य घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी संपूर्ण जिल्ह्यात बुधवारपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. ज्यादा दराने मास्कची विक्री आणि औषधाची साठेबाजी करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे. भीतीपोटी अनेक नागरिकांनी सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी केली. अद्याप नागरिकांचा खरेदीकडे कल आहे. मात्र, शहरात मागील पंधरा दिवसापासून सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध नसल्याची माहिती एका ठोक औषधविक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.वर्ध्यात मुंबई, नवी दिल्ली आणि नागपूर येथून सॅनिटायझर आणि मास्कचा ठोक औषधविक्रेत्यांना पुरवठा होतो. या औषधविक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना या वस्तूंचा पुरवठा केला जातो. मात्र, चीनमधील वुहानमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर या वस्तूंची निर्यात झाल्याचे सांगण्यात येते. याचाच परिणाम आता कंपनीतच माल नसल्याने त्यांनी पुरवठा बंद केला आहे. टंचाई निर्माण झाल्याने आणि मागणी वाढल्याने राज्यातील अनेक बड्या शहरांमध्ये या वस्तूंचा काळाबाजारही फोफावला असल्याची वास्तविक स्थिती आहे. मुंबई येथे अन्न व औषध प्रशासनाने नुकत्याच घातलेल्या छाप्यात बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला.केवळ २० तास करता येतो वापरडिस्पोझेबल मास्कचा वापर केवळ साधारणत: २० तासांकरिता करता येतो. मात्र, अनेकांनी खरेदी केल्यानंतर सलग पाच ते सहा दिवस त्याचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. वास्तविक एक दिवसापेक्षा अधिक दिवस त्याचा वापर करू नये, असे तज्ज्ञ डॉक्टर औषधविक्रेत्यांचे म्हणणे आहे. वापरानंतर डिस्पोझेबल मास्कची जाळून व अन्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.बाजारपेठेत फॅन्सी मास्क दाखलकोरोनाचा धसका घेतल्याने नागरिकांची पावले मास्क खरेदीकडे वळू लागली आहेत. मात्र, शहरातील बाजारपेठेत औषधविक्रेत्यांकडे मास्क उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक कापड दुकानात आणि हातगाड्यांवर सहज उपलब्ध होत असलेल्या जाळीदार कापडाचे मास्क खरेदी करीत आहेत. वातावरण लक्षात घेता काही व्यावसायिक संधीचे सोने करीत असल्याचे चित्र आहे.असे आहेत मास्कचे प्रकारमास्कमध्ये टू लेअर, थ्री लेअर, एन-९५ आणि डिस्पोझेबल याशिवाय अन्य प्रकार होतात. वर्गीकरणानुसार मास्कचे दर आहेत. यापूर्वी पाच रुपयांना मिळणाºया डिस्पोझेबल मास्कसह इतर मास्कला मोठी मागणी वाढली. मात्र, कंपन्यांकडून ठोक विक्रेत्यांना पुरवठाच बंद झाल्याने औषधविक्रेत्यांकडे कुठल्याच प्रकारचे मास्क उपलब्ध नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना