शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तळपत्या उन्हातही शहरात विजयाचा जल्लोष

By admin | Updated: May 17, 2014 00:26 IST

मतदानानंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांसह लोकशाहीवर प्रगाढ विश्‍वास ठेवणार्‍या नागरिकांच्या मनात महिनाभर कुजबूज होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्याचे सर्व चित्र स्पष्ट होत

पराग मगर - वर्धा

मतदानानंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांसह लोकशाहीवर प्रगाढ विश्‍वास ठेवणार्‍या नागरिकांच्या मनात महिनाभर कुजबूज होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्याचे सर्व चित्र स्पष्ट होत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांनी एकहाती आघाडी घेत विजय मिळविला. यामुळे शहरात भाजप कार्यालय व कार्यकर्त्यांत जल्लोष पाहायला मिळाला. नरेंद्र मोदी जिंदाबादचे नारे शहरात सर्वत्र ऐकावयास मिळत होते तर काँग्रेससह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी दिसत होती.

संपूर्ण भारताच्या निवडणुकांकडे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते. वृत्तवाहिन्यांमध्ये सकाळपासून निकाल दाखवायला सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाने सर्वत्र विजयी पताका फडकविल्याचे चित्र स्पष्ट होत होते. तरीही वर्धा लोकसभा मतदार संघात काय चित्र आहे. याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याला कारणही खास होते. काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात सरळ लढत होती. कोण जिंकणार, याची गणितं महिनाभरापासून मांडली जात होती. जिल्ह्यात मोदीलाट येणार अशा चर्चा होत्या. शुक्रवारच्या निकालाने हे चित्र स्पष्ट केले. शहरात काही ठिकाणी मोदी लाटेवर रामदास तडस यांचा विजय झाल्याचे तर काही ठिकाणी हा काँग्रेस पक्षावरचा राग असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. चौकाचौकात प्रत्येकाच्या मोबाईलवर व्हॉट्स अँप, मॅसेजद्वारे परिस्थिती काय आहे, हे कळत चित्र स्पष्ट होत गेले.

रामदास तडस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच तळपत्या उन्हातही शहरात फटाक्यांची आतषबाजी व बँडच्या तालावर रॅली निघाली. भाजप कार्यकर्त्यांत जोष संचारला होता. नरेंद्र मोदी जिंदाबाद, आलं रे कमळ, अशा घोषणा शहरात घुमत होत्या. भाजप कार्यालयासमोर दिवसभर फटाक्यांची आतषबाजी बघायला मिळाली.