शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

शहरात विद्रूपीकरणाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:39 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा प्रकार शहराच्या विद्रूपिकरणास कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देनाकाला रूमाल लावून करावी लागते ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा प्रकार शहराच्या विद्रूपिकरणास कारणीभूत ठरत आहे. सदर कचऱ्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.वर्धा शहरासह परिसरात सुमारे ३० मंगलकार्यालयांसह लॉन आहेत. जी मंगलकार्यालये व लॉन वर्धा न.प.च्या हद्दीत येता अशांना यापूर्वी न.प.च्या स्वच्छता विभागाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या; पण सध्यास्थितीत पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे सदर व्यावसायिकांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते.अनेक मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर गोळा होणारा कचरा व उर्वरित अन्न सध्या थेट मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानांमध्ये टाकले जात आहे. इतकेच नव्हे तर काही जण सदर कचरा थेट नाल्यांमध्ये टाकत असल्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिकांकडून सुरू असलेला हा मनमर्जी कारभार शहराच्या विद्रूपिकरणात भर टाकणारा ठरत आहे. सदर कचऱ्यामध्ये सर्वाधिक पूर्णपणे न जळणारा, न नष्ट होणाऱ्या प्लास्टिकचा समावेश असल्याचे दिसून येते. सदर प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तात्काळ पालिकेच्या स्वच्छता विभागातील वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.नाकाला रूमाल लावून करावी लागते ये-जाशहरातील गणेश टॉकीज परिसरातून पुलफैलकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यात काही लॉन व मंगल कार्यालय व्यावसायिकांकडून कार्यक्रम संपल्यानंतर लॉन व कार्यालयांमधील उर्वरित अन्न व कचरा टाकल्या जात आहे. या उर्वरित अन्नाच्या दुर्गंधीमुळे सदर परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच पुढील प्रवास करावा लागत आहे.सोमवारपासून न.प. स्वच्छता व आरोग्य विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान पाहणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- प्रवीण बोरकर,आरोग्य विभाग प्रमुख, न.प. वर्धा.वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शेजारून पुलफैलकडे जाणाऱ्या मार्गावर गणेश टॉकीज जवळील नाल्यात लॉन व मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर कचरा टाकल्या जात आहे. या कचऱ्यात उर्वरित अन्न तसेच प्लास्टिकचा सर्वाधिक समावेश राहतो. सदर प्रकारामुळे नाला बुजण्याची भीती बळावत आहे.