शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

शहरात विद्रूपीकरणाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:39 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा प्रकार शहराच्या विद्रूपिकरणास कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देनाकाला रूमाल लावून करावी लागते ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा प्रकार शहराच्या विद्रूपिकरणास कारणीभूत ठरत आहे. सदर कचऱ्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.वर्धा शहरासह परिसरात सुमारे ३० मंगलकार्यालयांसह लॉन आहेत. जी मंगलकार्यालये व लॉन वर्धा न.प.च्या हद्दीत येता अशांना यापूर्वी न.प.च्या स्वच्छता विभागाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या; पण सध्यास्थितीत पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे सदर व्यावसायिकांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते.अनेक मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर गोळा होणारा कचरा व उर्वरित अन्न सध्या थेट मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानांमध्ये टाकले जात आहे. इतकेच नव्हे तर काही जण सदर कचरा थेट नाल्यांमध्ये टाकत असल्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिकांकडून सुरू असलेला हा मनमर्जी कारभार शहराच्या विद्रूपिकरणात भर टाकणारा ठरत आहे. सदर कचऱ्यामध्ये सर्वाधिक पूर्णपणे न जळणारा, न नष्ट होणाऱ्या प्लास्टिकचा समावेश असल्याचे दिसून येते. सदर प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तात्काळ पालिकेच्या स्वच्छता विभागातील वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.नाकाला रूमाल लावून करावी लागते ये-जाशहरातील गणेश टॉकीज परिसरातून पुलफैलकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यात काही लॉन व मंगल कार्यालय व्यावसायिकांकडून कार्यक्रम संपल्यानंतर लॉन व कार्यालयांमधील उर्वरित अन्न व कचरा टाकल्या जात आहे. या उर्वरित अन्नाच्या दुर्गंधीमुळे सदर परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच पुढील प्रवास करावा लागत आहे.सोमवारपासून न.प. स्वच्छता व आरोग्य विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान पाहणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- प्रवीण बोरकर,आरोग्य विभाग प्रमुख, न.प. वर्धा.वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शेजारून पुलफैलकडे जाणाऱ्या मार्गावर गणेश टॉकीज जवळील नाल्यात लॉन व मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर कचरा टाकल्या जात आहे. या कचऱ्यात उर्वरित अन्न तसेच प्लास्टिकचा सर्वाधिक समावेश राहतो. सदर प्रकारामुळे नाला बुजण्याची भीती बळावत आहे.