शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पाण्यासाठी वानोडाचे नागरिक जि.प. सभागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:11 IST

सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाºया वानोडा येथे योजनेचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप पाणी पुरवठा सुरू झाला नाही. यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देराजकारण होत असल्याने संताप : पाण्यासाठी होतेय भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाºया वानोडा येथे योजनेचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप पाणी पुरवठा सुरू झाला नाही. यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काम पूर्ण झालेल्या योजनेतून त्वरित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करीत वानोडाच्या नागरिकांनी थेट जि.प. सभागृहात धडक दिली. ‘आम्हाला पाणी द्या’, अशी मागणी करीत सभागृहाचा परिसर दणाणून सोडला.वानोडा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. मागील एक ते दीड वर्षापासून योजनेचे बरेच काम पूर्णत्वास गेले असल्याने ही योजना कार्यान्वित करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या योजनेतील जलकुंभाचे बांधकाक करण्यात आले. गावात पाईपलाईनही टाकण्यात आली आहे; पण अद्यापही ही योजना कार्यान्वित झाली नाही. गावाच्या पाण्याचा प्रश्न असल्याने त्वरित या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करीत बुधवारी वानोडा येथील महिला-पुरूषांनी थेट जिल्हा परिषदेचे सभागृह गाठले. स्थायी समितीची बैठक संपताच जि.प. अध्यक्षांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली.नागरिकांची समस्या लक्षात घेत जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी वानोडा येथील पाणी पुरवठा तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. येळाकेळीचे सरपंच वैरागडे यांच्या नेतृत्वात धडकलेल्या वानोडा येथील नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषदेचा परिसर चांगलाच दणाणला होता.पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा; उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनयेळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या वानोडा येथील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले. योजनेचे बरेच काम पूर्ण झाल्याने लवकरच पाणी पुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती; पण यात राजकारण सुरू झाले आहे. ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेऊन काम निकृष्ट झाल्याची तक्रार करण्यात आली. यावरून चौकशीचा ससेमिरा लागला. हा प्रकार दूर करून त्वरित पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.वानोडा येथील नागरिकांनी याबाबत मंगळवारी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांना निवेदन दिले. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे तथा संबंधित विभागाला कळविण्याचे सांगितले. वानोडा येथील पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. गावात पाईपलाईनही टाकण्यात आली. महत्त्वाची दोन्ही कामे एक-दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाली. अद्याप ही योजना कार्यान्वित झाली नाही. या योजनेचे झालेले काम चांगल्या दर्जाचे असून काही काम अद्याप शिल्लक आहे. असे असले तरी पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून पाणी पुरवठा सुरू करावा, अशी रास्त मागणी आहे. निवेदनावर सतीश शेंडे, तेजराम लिबडे, प्रफुल कोरडे, गोपाल लिचडे, कैलास मडावी, पुंडलिक वैरागडे, कान्होजी सुरकार, रामकृष्ण बावणे, रामू धुर्वे, शंकर सुरजुसे, मनोहर सुरतकर, अशोक शेंडे, अजय कंडे, अमोल नरताम, दिलीप कडू, अरविंद शेंडे, चिंधू शेंडे, सुभाष भिसे आदींच्या सह्या आहेत.