शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

वेबसाईटवर माहिती टाकताना नागरिकांनी दक्ष राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:58 IST

सध्या तरूण पीढीला मोबाईलचे वेड लागलेले आहे. मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनिय माहिती जाहीर करून स्वत:चे नुकसान ते करीत आहेत.

ठळक मुद्देनिर्मलादेवी एस. : सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या तरूण पीढीला मोबाईलचे वेड लागलेले आहे. मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनिय माहिती जाहीर करून स्वत:चे नुकसान ते करीत आहेत. नागरिक म्हणून आपण विविध मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री असेल तरच माहिती द्यावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी केले. त्या सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. पुढे म्हणाल्या, पत्रकारांनी कुणाचीही फसगत होऊ नये म्हणून याबाबत योग्य माहिती घेऊन सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात सदर कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.केंद्र शासनाने देशातील ४२ अ‍ॅपवर बंदी घातलेली आहे. त्यात ट्रू कॉलरचाही समावेश आहे. ट्रू कॉलर अ‍ॅप डाऊन लोड केल्यास नागरिकांची फसगत होऊन नुकसान होऊ शकते, अशी माहिती याप्रसंगी सायबर विशेषतज्ञ कुलदीप टांकसाळे यांनी दिली.सदर कार्यशाळेत कुलदीप टांकसाळे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याची माहिती दिली. एचटीटीपीएस असलेली संकेत स्थळे वैद्य असतात. अनेकदा बनावट संकेत स्थळाद्वारे नागरिकांना फसविले जाते. यासाठी नागरिकांनी संकेत स्थळावर माहिती देताना ते बनावट नाही ना याची खात्री करावी. बँकींगचे व्यवहार करताना आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नये. नागरिकांची एटीएम द्वारे बँक खात्याची फसगत झाली असल्यास ४ ते २४ तासाच्या आत सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी. यासाठी बँक स्टेटमेंट सोबत न्यावे. यामुळे गुन्हेच्या तपासात मदत होत असून गुन्हेगाराचा शोध घेण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले.इंटरनेट स्वस्थ आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात वैयक्तिक माहिती मोबाईल अ‍ॅप आणि संकेत स्थळाच्या माध्यमातून टाकत असतो. महाजालातील माहिती पूर्णत: सुरक्षित असते असे नाही असे यावेळी टांकसाळे यांनी स्पष्ट केले.सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार सांगत टांकसाळे यांनी इंटरनेट बँकींग, फिशिंग, हॉकिंग, स्मिशिंग, नोकरी विषयक फसवणूक, वैवाहिक फसवणूक, शैक्षणिक फसवणूक इत्यादी प्रकारची माहिती उपस्थितांना दिली.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी जिल्ह्यात सायबर क्राईमचे ५३ गुन्हे दाखल असून २४ गुन्हे एटीएम बँकींगचे आहेत. यातील १२ गुन्ह्याच्या तपासामध्ये २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधीकडून सामान्य जनतेला सायबर सुरक्षविषयी जागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.मनीषा सावळे यांनी ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र अंतर्गत पत्रकार आणि प्रसार माध्यमासाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेशसिंह यांचे संकल्पनेतून राबविण्यात येते आहे.