शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

वेबसाईटवर माहिती टाकताना नागरिकांनी दक्ष राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:58 IST

सध्या तरूण पीढीला मोबाईलचे वेड लागलेले आहे. मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनिय माहिती जाहीर करून स्वत:चे नुकसान ते करीत आहेत.

ठळक मुद्देनिर्मलादेवी एस. : सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या तरूण पीढीला मोबाईलचे वेड लागलेले आहे. मोबाईलच्या वेडामुळे आपली गोपनिय माहिती जाहीर करून स्वत:चे नुकसान ते करीत आहेत. नागरिक म्हणून आपण विविध मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही याची खात्री असेल तरच माहिती द्यावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी केले. त्या सायबर सुरक्षा जागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. पुढे म्हणाल्या, पत्रकारांनी कुणाचीही फसगत होऊ नये म्हणून याबाबत योग्य माहिती घेऊन सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात सदर कार्यशाळा बुधवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.केंद्र शासनाने देशातील ४२ अ‍ॅपवर बंदी घातलेली आहे. त्यात ट्रू कॉलरचाही समावेश आहे. ट्रू कॉलर अ‍ॅप डाऊन लोड केल्यास नागरिकांची फसगत होऊन नुकसान होऊ शकते, अशी माहिती याप्रसंगी सायबर विशेषतज्ञ कुलदीप टांकसाळे यांनी दिली.सदर कार्यशाळेत कुलदीप टांकसाळे यांनी सायबर गुन्हे कसे घडतात याची माहिती दिली. एचटीटीपीएस असलेली संकेत स्थळे वैद्य असतात. अनेकदा बनावट संकेत स्थळाद्वारे नागरिकांना फसविले जाते. यासाठी नागरिकांनी संकेत स्थळावर माहिती देताना ते बनावट नाही ना याची खात्री करावी. बँकींगचे व्यवहार करताना आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी कुणालाही सांगू नये. नागरिकांची एटीएम द्वारे बँक खात्याची फसगत झाली असल्यास ४ ते २४ तासाच्या आत सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी. यासाठी बँक स्टेटमेंट सोबत न्यावे. यामुळे गुन्हेच्या तपासात मदत होत असून गुन्हेगाराचा शोध घेण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले.इंटरनेट स्वस्थ आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात वैयक्तिक माहिती मोबाईल अ‍ॅप आणि संकेत स्थळाच्या माध्यमातून टाकत असतो. महाजालातील माहिती पूर्णत: सुरक्षित असते असे नाही असे यावेळी टांकसाळे यांनी स्पष्ट केले.सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार सांगत टांकसाळे यांनी इंटरनेट बँकींग, फिशिंग, हॉकिंग, स्मिशिंग, नोकरी विषयक फसवणूक, वैवाहिक फसवणूक, शैक्षणिक फसवणूक इत्यादी प्रकारची माहिती उपस्थितांना दिली.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी जिल्ह्यात सायबर क्राईमचे ५३ गुन्हे दाखल असून २४ गुन्हे एटीएम बँकींगचे आहेत. यातील १२ गुन्ह्याच्या तपासामध्ये २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधीकडून सामान्य जनतेला सायबर सुरक्षविषयी जागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.मनीषा सावळे यांनी ट्रान्सफारमिंग महाराष्ट्र अंतर्गत पत्रकार आणि प्रसार माध्यमासाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेशसिंह यांचे संकल्पनेतून राबविण्यात येते आहे.