शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बारविरोधात नागरिक रस्त्यावर

By admin | Updated: April 3, 2017 01:26 IST

बाणेर रोडवरील डेरॉन हाईट्स इमारतीत सुरू असलेल्या पाच बारच्या विरोधात नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.

पारा ४२.६ अंशावर : शहरातील रस्त्यांवर दुपारच्यावेळी शुकशुकाट वर्धा : मार्चखेरीस पारा ४३ अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाची दाहकता चांगलीच जाणवत आहे. याचा परिणाम जनजीवनावर होत असून दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यावरची वर्दळ कमी झालेली दिसते. कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक शक्यतो सकाळच्या वेळेत कामे आटोपण्याचा प्रयत्न करतात. प्रखर उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळेच दुपारच्या वेळेत शहराच्या रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो. बहुतांश नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर जाण्याचे टाळताना दिसतात. पारा चाळिसीपार गेल्यावरच उन्हाची तीव्रता जाणवायला लागली होती. त्यातच कमाल आणि किमान तापमान वाढतच असल्याने उन्हाच्या झळा अधिकच जाणवत आहे. या उन्हात फिरताना अंगाची लाहीलाही होते. दुपारच्या वेळतील उन्हाच्या झळा प्रखर असतात. या उन्हात फिरणे ही बाब आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाज किंवा अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. आजारी व्यक्ती व लहान मुलांनी यावेळेत घराबाहेर पडणे टाळावे. याचाच परिणाम म्हणून शहरातील सर्व वर्दळीचे मार्ग दिवसाला जवळपास निर्मनुष्य झालेले दिसतात. (स्थानिक प्रतिनिधी) एप्रिलचे तापमान यंदा मार्च महिन्यापासून जाणवायला लागले. दिवसभर वातावरण तापल्याने या उन्हाच्या झळा रात्री ८ वाजेपर्यंत जाणवतात. मात्र सूर्य मावळतीला लागल्यावर शहरातील सर्व प्रमुख वर्दळीचे रस्ते पुन्हा गर्दीने फुललेले दिसतात. मात्र दिवसाच्यावेळी अघोषित संचारबंदी असल्यकहे दिसते. यातच अघोषित भारनियमन केले जाते. प्रत्यक्षात भारनियमन नाही. त्याबाबतचे वेळापत्रक संअंधीत यंत्रणेने जाहीर केलेले नाही. तरीही दिवसातून दोन ते तीन वेळा काही वेळाकरिता वीजपुरवठा खंडित होतो. दुपारच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. आकोली - मार्च अखेरीस तापमानात अचानक वाढ झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण जीवनावर पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील रस्ते ओस पडले आहे. त्यामुळे शेतीची कामेही प्रभावित झाली आहे. शेतात काम करायला मजूर येत नाही. दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत असल्याने सायंकाळनंतर रस्त्यावर वर्दळ पाहायला मिळते. सूर्य प्रखरतेने आग ओकत आहे. सकाळी १० वाजतानंतर उन्हाचा झळा अधिक जाणवतात. उन्हाच्या तीव्र झळामुळे ग्रामीण भाग होरपळला आहे. त्यात अघोषित भारनियमन केले जाते. त्यामुळे उकाड्यात अधिक भर पडत असल्याचे दिसते. गावातील रस्त्यावर सध्या शांतता दिसत आहे. लोक शक्यतो १२ वाजेपर्यंत कामे उरकवून घेतात. वाढत्या उकाड्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहे. वखरणी, नांगरणी ही कामे खोळंबली आहे. शेतातील कचरा वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे.