शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

नागरिकांना काढावा लागतो खड्डे व चिखलातून मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:35 IST

गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देगणेश नगरवासियांची व्यथा : नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.गणेशनगरच्या नागरिकांना जाण्याकरिता वर्धा-हिंगणघाट मार्गास जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्याच्या एका बाजूला गोल्डन किड्स कॉन्व्हेंट तर दुसºया बाजूला महाकालीचे मंदिर आहे. या रस्त्याने विद्यार्थी, बालक, पालक आणि भाविकांची नेहमी गर्दी असते. वर्धा-हिंगणघाट या मार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहणाचीही नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या भागात राहणाºया नागरिकांना त्यांच्या घरी जाण्याकरिता पाणी साचलेल्या खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांना चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्याने अनेकदा किरकोळ अपघात सुध्दा झाले आहेत. त्यामुळे नागरिक मनात अपघाताची भिती घेऊन या मार्गे ये-जा करीत असतात. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत खड्ड्यात झाडे लावली. नगर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत डागडूजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा समता सैनिक दल व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाला समता सैनिक दलाचे विदर्भ प्रदेश मार्गदर्शक अभय कुंभारे, भारीप बहुजन महासंघाचे शहर संघटक गौतम देशभ्रतार, विकास मून, मोहन मेश्राम, विजय वानखेडे, वसंता हातमोडे, शामराव डहाके, प्रदीप भगत, जयंत गोडघाटे, दादाराव सेलकर आदीसह नागरिक उपस्थित होते.पालिकेची हद्द समस्याग्रस्तगोल्डन किड्स कॉन्व्हेंट ते मुख्य रस्त्यापर्यंतचा भाग हा नगर परिषदेच्या हद्दीत येत असून पावसाच्या दिवसात गणेश नगरातील या भागात रस्त्याची समस्या डोके वर काढत असते. याची माहिती नगर परिषद प्रशासनाला असून त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गणेश नगर भागातील नागरिकांचा आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा