शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नागरिकांना काढावा लागतो खड्डे व चिखलातून मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:35 IST

गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देगणेश नगरवासियांची व्यथा : नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.गणेशनगरच्या नागरिकांना जाण्याकरिता वर्धा-हिंगणघाट मार्गास जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्याच्या एका बाजूला गोल्डन किड्स कॉन्व्हेंट तर दुसºया बाजूला महाकालीचे मंदिर आहे. या रस्त्याने विद्यार्थी, बालक, पालक आणि भाविकांची नेहमी गर्दी असते. वर्धा-हिंगणघाट या मार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहणाचीही नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या भागात राहणाºया नागरिकांना त्यांच्या घरी जाण्याकरिता पाणी साचलेल्या खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांना चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्याने अनेकदा किरकोळ अपघात सुध्दा झाले आहेत. त्यामुळे नागरिक मनात अपघाताची भिती घेऊन या मार्गे ये-जा करीत असतात. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत खड्ड्यात झाडे लावली. नगर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत डागडूजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा समता सैनिक दल व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाला समता सैनिक दलाचे विदर्भ प्रदेश मार्गदर्शक अभय कुंभारे, भारीप बहुजन महासंघाचे शहर संघटक गौतम देशभ्रतार, विकास मून, मोहन मेश्राम, विजय वानखेडे, वसंता हातमोडे, शामराव डहाके, प्रदीप भगत, जयंत गोडघाटे, दादाराव सेलकर आदीसह नागरिक उपस्थित होते.पालिकेची हद्द समस्याग्रस्तगोल्डन किड्स कॉन्व्हेंट ते मुख्य रस्त्यापर्यंतचा भाग हा नगर परिषदेच्या हद्दीत येत असून पावसाच्या दिवसात गणेश नगरातील या भागात रस्त्याची समस्या डोके वर काढत असते. याची माहिती नगर परिषद प्रशासनाला असून त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गणेश नगर भागातील नागरिकांचा आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा