शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

पाणीटंचाईने नागरिक हैराण

By admin | Updated: March 17, 2017 01:58 IST

जिल्ह्यात पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. ही टंचाई निवारण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आराखडा तयार करण्यात आला आहे.

उपाययोजना कागदावरच : पारोधीत भटकंती, वर्धेत पाईप पडले पण नळजोडण्या नाही वर्धा : जिल्ह्यात पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. ही टंचाई निवारण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. यात पाणीटंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा खर्च दर्शविला आहे. असे असताना उग्र होत असलेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना होताना दिसत नाही. समुद्रपूर तालुक्यात पारोधी या गावात पाणी चांगलेच पेटले आहे. येथे पाण्याकरिता महिलांवर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. तर वर्धा शहरातील पुलफैल भागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे. या भागात पालिकेच्यावतीने नळयोजनेचे पाईप टाकण्यात आले आहे. मात्र पालिकेत नळजोडणीकरिता कुठल्या नागरिकाकडून अर्ज आला नसल्याने येथे एकाही घरी नळजोडणी देण्यात आली नसल्याची माहिती आहे. तर पालिकेच्यावतीने येथे एखादा सार्वजनिक नळ देणे गरजेचे असताना तोही देण्यात आला नसल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.(प्रतिनिधी) पाईपलाईन असताना नळ नाही; पालिकेकडून निदान सार्वजनिक नळ देण्याची गरज वर्धेतील पुलफैल परिसरातील नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. या भागातील नागरिकांना पाणी मिळावे याकरिता पालिका प्रशासनाच्यावतीने नळयोजनेच्या माध्यमातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र या भागातील एकाही नागरिकाडून नळजोडणीकरिता अर्ज आला नाही. परिणामी नळ योजना कार्यान्वीत करून येथे कोणताही लाभ होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याकरिता या परिसरात असलेल्या हातपंपावरच अवलंबून राहावे लागत आहे. एकाच हातपंपावर सतत पाण्याचा उपसा होत असल्याने हा हातपंप आणखी किती दिवस साथ देईल, याचा कुठलाही नेम नाही. यामुळे येत्या दिवसात येथे पाणी टंचाई आणखी तिव्र होण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे पालिकेच्यावतीने या भागात वेळीच उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची समस्या मार्गी काढण्याची मागणी आहे. पारोधीत पाणीटंचाई तीव्र; मार्ग काढण्याची मागणी समुद्रपूर- तालुक्यातील पारोधी गावातील पाणीटंचाईवर आंदोलनानंतर कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही. परिणामी, पाण्याकरिता महिलांच्या होणाऱ्या भटकंतीने असंतोष पसरला आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे. येत्या चार दिवसात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मार्ग निघाला नाही तर येथील महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुलेबाळे घेवून आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. गत १५ दिवसांपूर्वी पारोधी येथे पाणीटंचाई निवारणार्थ नवा बोर खोदण्याबाबत महिलांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि समुद्रपूर पोलीस ठाण्यात मोर्चा नेला होता. त्यानंतर लोकशाही दिनी महिलांनी पुन्हा धडक दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात जात पाणीटंचाई निवारण्याच्या सूचना केल्या. यावरून तहसीलदार दीपक करंडे, बीडीओ विजय लोंढे यांनी गावात जात पाहणी केली. यावेळी त्यांनी गावात असलेली बोरची समस्या मार्गी काढण्याऐवजी विहीर अधिग्रहणाबाबत चर्चा करून ते परत आले. अद्याप येथील पाणी समस्या मार्गी निघाली नाही. यामुळे गावातील पाणी समस्या ताबडतोब सोडवावी याकरिता पारोधी येथील विद्या मेंढे, मीरा झाडे, प्रतिभा तांदुळकर, भारती लोणारे, छबुबाई आडकिने, रंजना कांबळे, शालू डंभारे, कमला अबलनकर, रमा ढाकणे, शीतल शेळकी इत्यादी महिलांनी पाणीटंचाई समस्या त्वरीत सोडवावी असी मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)