शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनीच तोडले गतिरोधक

By admin | Updated: September 23, 2016 02:29 IST

शहरातील बहुतांश भागांत नागरिकांनी स्वत:च मनमर्जी गतिरोधक निर्माण केले आहेत.

प्रशासनाचे होते दुर्लक्ष : शहरातील अन्य भागांतही डोकेदुखीवर्धा : शहरातील बहुतांश भागांत नागरिकांनी स्वत:च मनमर्जी गतिरोधक निर्माण केले आहेत. हे गतिरोधक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत होते. याबाबत तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. अखेर शाक्य नगरातील संतप्त नागरिकांनी स्वत:च गतिरोधक खणून काढले. यामुळे वाहतुकीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. वर्धा-यवतमाळ रस्त्यालगत असलेल्या देवळी नाक्याजवळील सिंदी कॉलनी परिसरात प्रत्येक रस्त्यावर बेकायदेशीर गतिरोधक निर्माण करण्यात आले होते. याबाबत अनेकदा वर्धा नगर पालिकेला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आलीत. या भागातील नगर सेवक रमन लालवानी यांच्याकडेही वारंवार तक्रारी केल्या; पण कुणीही कार्यवाही केली नाही. परिणामी, नागरिकांना ये-जा करताना प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या. याबाबत वारंवार तक्रारी करूनही अनधिकृतरित्या बांधलेले गतिरोधक तोडण्यात आले नाही. उलट गतिरोधकांच्या संख्येत वाढ झाली. या परिसरात एकूण ६१ अनधिकृत गतिरोधक आहेत. यापैकी काही गतिरोधक इतके उंच आहेत की, वाहनाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मानेचे आणि कंबरेचे आजार जडू लागले आहेत. गतिरोधकामुळे झटके लागत असल्याने वृद्ध आणि महिलांना वाहने चालविणे कठीण झाले. सदर अनधिकृत गतिरोधक तोडण्याबाबत पहिले निवेदन ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, न.प. मुख्याधिकारी, न.प. अध्यक्षांना दिले. मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली; पण कार्यवाही केली नाही. नगरसेवक रमन लालवानी यांनी, वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून बांधण्यात आले आहे, असे सांगितले. वास्तविक, रस्त्यावरून घरांमध्ये नळ जोडणी घेण्यात आली. पाईपला वाहनांमुळे नुकसान होऊ नये म्हणून परवानगी न घेता गतिरोधक बांधले. सात महिने कार्यवाही न झाल्याने शाक्यनगरच्या नागरिकांनी रविवारी काही गतिरोधक तोडले. आणखी अनधिकृत गतिरोधक कायम आहे. या उपक्रमात संजय जवादे, सिद्धार्थ आवळे, नाना बागडे, कुलदीप बनोदे, गौतम तुपसौंदर्य, अवी बन्सोड, दशरथ मोहिते, प्रमोद माहोरे, राजू मोडक, अमोल पाटील, संजय जंगले, सोहनिल तडसे, भीमराव कोसारे, निखील केसार आदींनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)