शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

‘नगर रचने’च्या संथ कामाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: November 19, 2015 02:50 IST

शासनाने शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींमधील बांधकामावरील बंदी उठवत त्यासाठी अन्य विभागांप्रमाणेच नगर रचनाकार विभागाची परवानगी आवश्यक केली आहे.

एकाच कामासाठी वारंवार चकरा : प्रत्येक वेळेस काढल्या जातात वेगवेगळ्या त्रुटीवर्धा : शासनाने शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींमधील बांधकामावरील बंदी उठवत त्यासाठी अन्य विभागांप्रमाणेच नगर रचनाकार विभागाची परवानगी आवश्यक केली आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. येथील कर्मचारी एकाचवेळी कागदपत्रांमधील त्रूटी न सांगता वारंवार त्या सांगून कार्यालयाच्या चकरा मारायला लावत असल्याचा आरोप नागरिकांद्वारे केला जात आहे. कामाचे स्वरूप सोपे करून नागरिकांना होत असलेला त्रास थांबवावा, अशी मागणी होत आहे. अनेक दिवस लोटूनही कामे पूर्ण होत नसल्याचा प्रत्यय नागरिकांना वारंवार येत आहे. कर्मचाऱ्यांच्या बेफीकीर व सावकाश काम करण्याच्या पद्धतीने वारंवार उंबरठे झिजवूनही बांधकामाची प्रकरणे निकाली निघत नाहीत. बांधकाम परवानगीसह भूखंड विभाजनाची विविध प्रकरणे या कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती आहे. अकरा ग्रामपंचायतीमध्ये परवानगी मिळत नसल्यामुळे अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अर्धवट होते. या बंदीमुळे अनेकांनी परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकामे केली; पण आता बांधकामाला शासनाने परवानगी दिल्यानंतर कायदेशीर मार्गाने बांधकाम करण्यासाठी नगर रचनाकार विभागाकडे अनेकांनी अर्ज दाखल केले. सदर अर्जदारांना परवानगी मिळविण्यासाठी नगर रचनाकार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. नगर रचनाकार विभागाच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांना बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत.अनेकांनी ग्रामपंचायतीमार्फत नगर रचनाकार विभागाकडे अर्ज सादर केलेत; पण त्रूटी काढून प्रकरणे परत पाठविण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच आहे. महिनाभराच्या कालावधीत घरांच्या बांधकामाची परवानगी प्रकरणे निकाली काढणे आवश्यक आहे. असे असतानाही महिना लोटूनही बांधकाम परवानगीची प्रकरणे निकाली निघत नाही. परिणामी, सर्वसामान्यांची अडचण होत आहे. बांधकाम करताना एका सातबाऱ्यावर दोघांचे नाव असल्यास भूखंडाचे विभाजन करावे लागते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयातून ग्रामपंचायत, तलाठी आणि नगर रचनाकार विभागाला पत्र पाठवून अहवाल मागितला जातो. तशी प्रक्रियाही काहींनी केली; पण ठराविक वेळेत अहवाल दिल्यानंतरही नगर रचनाकार विभागात अहवालासाठीही टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्यांना परवानगीसाठी एवढी चालढकल करीत त्रास का दिला जातो, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. प्रत्येकवेळी वेगळे कारण समोर करून परवानगी देण्यास चालढकल केली जात असल्याने या विभागाच्या कामकाजाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांद्वारे होऊ लागली आहे.(शहर प्रतिनिधी)रिक्त पदांमुळे कामात येतात अडचणीनगर रचना कार्यालयात रिक्त पदांचा अनुशेष असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन ते चार पदे येथे रिक्त आहेत. त्याचा परिणाम नागरिकांच्या कामावर होत असून एकाच कामासाठी नागरिकांना महिनाभरात वारंवार चकरा माराव्या लागत आहे. तरीही त्यांची कामे पूर्ण व्हायला तयार नाही. त्यामुळे संतापलेले नागरिक आणखी काय हवय असा प्रतिप्रश्न करीत असतात. कामाचा व्याप वाढत असला तरी या कार्यालयात कर्मचारी पुरेसे नाहीत. परिणामी कामाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे आधी पदांचा भरणा करावा अशी मागणीही होत आहे.