शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘नगर रचने’च्या संथ कामाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: November 19, 2015 02:50 IST

शासनाने शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींमधील बांधकामावरील बंदी उठवत त्यासाठी अन्य विभागांप्रमाणेच नगर रचनाकार विभागाची परवानगी आवश्यक केली आहे.

एकाच कामासाठी वारंवार चकरा : प्रत्येक वेळेस काढल्या जातात वेगवेगळ्या त्रुटीवर्धा : शासनाने शहरालगतच्या अकरा ग्रामपंचायतींमधील बांधकामावरील बंदी उठवत त्यासाठी अन्य विभागांप्रमाणेच नगर रचनाकार विभागाची परवानगी आवश्यक केली आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. येथील कर्मचारी एकाचवेळी कागदपत्रांमधील त्रूटी न सांगता वारंवार त्या सांगून कार्यालयाच्या चकरा मारायला लावत असल्याचा आरोप नागरिकांद्वारे केला जात आहे. कामाचे स्वरूप सोपे करून नागरिकांना होत असलेला त्रास थांबवावा, अशी मागणी होत आहे. अनेक दिवस लोटूनही कामे पूर्ण होत नसल्याचा प्रत्यय नागरिकांना वारंवार येत आहे. कर्मचाऱ्यांच्या बेफीकीर व सावकाश काम करण्याच्या पद्धतीने वारंवार उंबरठे झिजवूनही बांधकामाची प्रकरणे निकाली निघत नाहीत. बांधकाम परवानगीसह भूखंड विभाजनाची विविध प्रकरणे या कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती आहे. अकरा ग्रामपंचायतीमध्ये परवानगी मिळत नसल्यामुळे अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अर्धवट होते. या बंदीमुळे अनेकांनी परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकामे केली; पण आता बांधकामाला शासनाने परवानगी दिल्यानंतर कायदेशीर मार्गाने बांधकाम करण्यासाठी नगर रचनाकार विभागाकडे अनेकांनी अर्ज दाखल केले. सदर अर्जदारांना परवानगी मिळविण्यासाठी नगर रचनाकार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. नगर रचनाकार विभागाच्या कामचुकार धोरणामुळे नागरिकांना बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत.अनेकांनी ग्रामपंचायतीमार्फत नगर रचनाकार विभागाकडे अर्ज सादर केलेत; पण त्रूटी काढून प्रकरणे परत पाठविण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच आहे. महिनाभराच्या कालावधीत घरांच्या बांधकामाची परवानगी प्रकरणे निकाली काढणे आवश्यक आहे. असे असतानाही महिना लोटूनही बांधकाम परवानगीची प्रकरणे निकाली निघत नाही. परिणामी, सर्वसामान्यांची अडचण होत आहे. बांधकाम करताना एका सातबाऱ्यावर दोघांचे नाव असल्यास भूखंडाचे विभाजन करावे लागते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयातून ग्रामपंचायत, तलाठी आणि नगर रचनाकार विभागाला पत्र पाठवून अहवाल मागितला जातो. तशी प्रक्रियाही काहींनी केली; पण ठराविक वेळेत अहवाल दिल्यानंतरही नगर रचनाकार विभागात अहवालासाठीही टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्यांना परवानगीसाठी एवढी चालढकल करीत त्रास का दिला जातो, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. प्रत्येकवेळी वेगळे कारण समोर करून परवानगी देण्यास चालढकल केली जात असल्याने या विभागाच्या कामकाजाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांद्वारे होऊ लागली आहे.(शहर प्रतिनिधी)रिक्त पदांमुळे कामात येतात अडचणीनगर रचना कार्यालयात रिक्त पदांचा अनुशेष असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन ते चार पदे येथे रिक्त आहेत. त्याचा परिणाम नागरिकांच्या कामावर होत असून एकाच कामासाठी नागरिकांना महिनाभरात वारंवार चकरा माराव्या लागत आहे. तरीही त्यांची कामे पूर्ण व्हायला तयार नाही. त्यामुळे संतापलेले नागरिक आणखी काय हवय असा प्रतिप्रश्न करीत असतात. कामाचा व्याप वाढत असला तरी या कार्यालयात कर्मचारी पुरेसे नाहीत. परिणामी कामाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे आधी पदांचा भरणा करावा अशी मागणीही होत आहे.