शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

१६ तास खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2016 02:12 IST

गत चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा धुमाकूळ आहे. परिणामी, वीज पुरवठ्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

हिंगणघाट : गत चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा धुमाकूळ आहे. परिणामी, वीज पुरवठ्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी (दि.६) आलेल्या वादळामुळे वीज पुरवठा तब्बल १६ तास खंडित राहिला. यामुळे महावितरणची निष्क्रियता दिसून आली. खंडित विजेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसोबत आता वीज ही अत्यावश्यक बाब झाली आहे. विजेशिवाय सुविधा अपूर्ण ठरतात. यातच १६ तास वीज खंडित राहिल्यास नागरिकांना असह्य होते. याचा अनुभव जुन्या वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी घेतला. शुक्रवारी आलेल्या वाऱ्याने परिसरातील टिना उडाल्या, कच्ची छपरे पडली, वृक्ष कोलमडले, विजेचे खांब वाकले. यातच तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. एकदा खंडित झालेला हा वीज पुरवठा तब्बल १६ तास दुरूस्त होऊ शकला नाही. या प्रकारामुळे घरोघरी चालणारे कुलर, पाण्याची मोटर, टीव्ही, बल्ब या बाबी प्रभावीत झाल्या. या दिवशी रात्री अनेकांना झोपताही आले नाही. सायंकाळी ७ वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. जुन्या वस्तीमध्ये वीज खंडित होणे, हा प्रकार नवीन नाही. वारंवार व अनेकदा रात्री वीज खंडित होत असल्याने काळोखात राहावे लागते. वारा सुटला वा साधारण पाऊस आला तरी वीज खंडित होते. रविवारी पाच तास वीज पुरवठा खंडित होता. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)