शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

१६ तास खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 9, 2016 02:12 IST

गत चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा धुमाकूळ आहे. परिणामी, वीज पुरवठ्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

हिंगणघाट : गत चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा धुमाकूळ आहे. परिणामी, वीज पुरवठ्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी (दि.६) आलेल्या वादळामुळे वीज पुरवठा तब्बल १६ तास खंडित राहिला. यामुळे महावितरणची निष्क्रियता दिसून आली. खंडित विजेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसोबत आता वीज ही अत्यावश्यक बाब झाली आहे. विजेशिवाय सुविधा अपूर्ण ठरतात. यातच १६ तास वीज खंडित राहिल्यास नागरिकांना असह्य होते. याचा अनुभव जुन्या वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी घेतला. शुक्रवारी आलेल्या वाऱ्याने परिसरातील टिना उडाल्या, कच्ची छपरे पडली, वृक्ष कोलमडले, विजेचे खांब वाकले. यातच तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. एकदा खंडित झालेला हा वीज पुरवठा तब्बल १६ तास दुरूस्त होऊ शकला नाही. या प्रकारामुळे घरोघरी चालणारे कुलर, पाण्याची मोटर, टीव्ही, बल्ब या बाबी प्रभावीत झाल्या. या दिवशी रात्री अनेकांना झोपताही आले नाही. सायंकाळी ७ वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. जुन्या वस्तीमध्ये वीज खंडित होणे, हा प्रकार नवीन नाही. वारंवार व अनेकदा रात्री वीज खंडित होत असल्याने काळोखात राहावे लागते. वारा सुटला वा साधारण पाऊस आला तरी वीज खंडित होते. रविवारी पाच तास वीज पुरवठा खंडित होता. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)