शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

सर्दी-खोकल्याच्या आजारांमुळे नागरिक बेजार

By admin | Updated: January 12, 2015 22:58 IST

आठवडाभरापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले आहेत. रात्रीसह दिवसाही थंडीचा कहर सध्या सुरू आहे. यामुळे घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

वर्धा : आठवडाभरापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले आहेत. रात्रीसह दिवसाही थंडीचा कहर सध्या सुरू आहे. यामुळे घरोघरी सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तींच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. सायंकाळनंतर खूप थंडी व दिवसा काहीसा उकाडा अशा वातावरणामुळे साथीचे आजार बळावत आहेत. वातावरणातील अचानक बदलामुळे विषाणुजन्य आजारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधीच श्वासाचे विकार असणाऱ्या व्यक्तींना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. थंडीमुळे कोरडी हवा श्वासोच्छवासामुळे आत जाते व याचा परिणाम फुफ्फुसावर जाणवतो. थंडीमुळे घसा खवखवणे, घशाचे संसर्ग असे आजार होतात. यापासूनच श्वसनाचा आजारही बळावतो. दम्याच्या रुग्णांना या वातावरणात अधिक त्रास होतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. जास्त वेळ उपाशी राहणे या काळात अपायकारक सिद्ध होते. त्यामुळे नियमित सकस आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर्स रुग्णांना देत आहेत. नियमित फिरायला जाणे, व्यायाम करणे, एकाच वेळी न खात थोडे थोडे चार, पाच वेळा खाणे, रोज तीन ते चार लिटर पाणी पिणे, राजे एक फळ किंवा सुखा मेवा खाणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर्स सांगत आहेत.सर्दी, पडसा, खोकला व त्यामुळे आलेल्या तापावर वेळीच उपचार न केल्यास ताप वारंवार येतो. परिणामी रुग्णांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. वयोवृद्धांना अशा गारठ्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे लहान मुले आन्मि वृद्धांची जास्त काळजी घेने गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)