शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

भारनियमनाविरूद्ध अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:58 IST

धोत्रा, मदनी, वायगाव सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांत मागील एक महिन्यापासून थ्री-फेजचे भारनियमन सुरू आहे. यात तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री भारनियमन केले जाते. परिणामी, पिकांचे ओलित धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देओलिताअभावी पिके धोक्यात : शेतकºयांच्या संतापामुळे अधिकाºयांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धोत्रा, मदनी, वायगाव सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांत मागील एक महिन्यापासून थ्री-फेजचे भारनियमन सुरू आहे. यात तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री भारनियमन केले जाते. परिणामी, पिकांचे ओलित धोक्यात आले आहे. यामुळे संतप्त शेतकºयांनी सोमवारी महावितरणचे कार्यालय गाठून अभियंत्यांना घेराव घातला. शेतकºयांचा रोष पाहून अधीक्षक अभियंत्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.एक महिन्यापासून रात्री भारनियमन केले जात असल्याने पिकांना आवश्यक पाणी देणे कठीण झाले आहे. आठवड्यातून केवळ ३ दिवस दिवसा वीज मिळत असून उर्वरित दिवशी भारनियमन केले जात आहे. आठवड्यातून ५ दिवस दिवसा वीज पुरवठा करावा, या मागणीकरिता माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात तळेगाव (टा.), वायगाव (नि.), आष्टा, नेरी, भूगाव, करंजी (काजी), जऊळगाव, सोनेगाव (स्टे.) येथील शेतकºयांनी सोमवारी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना घेराव घातला. तीन ऐवजी ५ दिवस दिवसा वीज पुरवठ्याची मागणी लावून धरण्यात आली. यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली. शेतकºयांचा संताप पाहून अधीक्षक अभियंत्यांनी त्वरित शासनाकडे प्रस्ताव पाठविला. यावरील निर्णयाची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. आंदोलनात विजय भालकर, सरपंच अरुण बालपांडे, किशोर पोटदुखे, जया वेले, अरुण राऊत, किशोर कुबडे, सुरेश बीजवार, कवडू पोटदुखे, दिलीप भोमले, ग्रा.पं. सदस्य व शेतकरी सहभागी झाले.रात्री-बेरात्री करावे लागते ओलीतसध्या कपाशी तथा तूर पिकाला ओलीत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. काही शेतांत कापूस फुटला असला तरी अनेक शेतकºयांचा कापूस फुटलेला नाही. शिवाय तुरीसह अन्य पिकांनाही सध्या पाण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी दिवसरात्र एक करून पिके वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यात महावितरणचे भारनियमन मात्र अडथळा निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसा वीज पुरवठा मिळत नसल्याने रात्री ओलित केले जाते; पण आता रात्रीही भारनिमयन केले जात असल्याने ओलित कधी करावे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.