शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

घराणेशाही-सहानुभूतीमुळे चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:36 IST

सेलू तालुक्यात होत असलेल्या झडशी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक घराणेशाही कि सहानुभुती अशी होत असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देझडशी जि.प.पोटनिवडणूक : मतमोजणीनंतर स्पष्ट होणार कौल

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तालुक्यात होत असलेल्या झडशी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक घराणेशाही कि सहानुभुती अशी होत असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.जिल्हा परीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या क्षेत्रातून विवेक हळदे हे काँग्रेसच्या चिन्हावर भरघोस मतांनी विजयी झाले होते. झडशी क्षेत्राच्या विकासासाठी धडपडणाऱ्या विवेक हळदे यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. त्यामुळे येथील जागा रिक्त झाली. त्याच जागेसाठी २३ रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक अविरोध होईल, असा अंदाज मतदार व्यक्त करीत असताना सहा उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. यात काँग्रेसकडून सौरभ शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागत साबळे, भा.ज.पा.चे भुषण पारटकर, बसपाचे अरूण शंभरकर तर अपक्ष म्हणून विलास राऊत व रोषण राऊत राजकीय भविष्य आजमावत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत झडशी ग्रा.पं.मध्ये विवेक हळदे यांच्या पत्नीला मतदारांनी बहूमताचा कौल देत सरपंचपदी विराजमान केले.त्यामुळे या कुटूंबातून जि. प. निवडणुकीकरिता उमेदवार दिला नाही. तर टाकळी येथील ग्रा.पं.ची सत्ता हातात घेणाऱ्यांना जि.प.पोटनिवडणुकीचा मोह आवळता आला नसल्याची चर्चा परिसरात होत आहे. तालुक्यात काँग्रेसचे शेखर शेंडे व पप्पु जयस्वाल असे दोन गट असले तरी. नुकत्याच पार पडलेल्या ग्रा.पं.निवडणुकीत ते एकजूट असल्याचे चित्र बघावयास मिळाले. यामुळे याही पोटनिवडणुकीत काँग्रेस चमकेल काय याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. तर भा.ज.पा.मध्ये उमेदवाराकरिता अनेक दावेदार असताना स्थानिक नेत्याने आपल्याच नातेवाईकास उमेदवारी दिल्याच्या कारणाने भाजपा कार्यकर्त्यात एकजुट नसल्याची चर्चा होत आहे. ही निवडणूक तिहेरी होईल, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविला जात असून विवेक हळदे यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाटही या भागात असल्याचे बोलले जात आहे. परंतु, प्रत्यक्ष मतदान होऊन मतमोजणी झाल्यावरच विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे स्पष्ट होणार आहे.काँग्रेसचा गडमतदार कुणाच्या बाजूने बहुमताचा कौल देतात हे निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होणार आहे. झडशी जि.प. क्षेत्राकडे दिवंगत आमदार प्रमोद शेंडे यांचे विशेष लक्ष राहात असे. त्यामुळे हा काँग्रेसचा गड मानला जातो. या निवडणुकीत मतदार गड कायम ठेवणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक