शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

भाजपात तीन महिला सदस्यांच्या नावावर मंथन

By admin | Updated: September 18, 2014 23:38 IST

२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून भाजपातून तीन

वर्धा : २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून भाजपातून तीन महिलांची नावे पुढे आली आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालायची यावर श्रेष्ठींमध्ये विचारमंथन सुरु असल्याची माहिती आहे.जि. प. वर पहिल्यांदा झेंडा फडकणार, अशी आशा भाजप नेते बाळगून आहेत. या अनुषंगाने नव्या अध्यक्षपदासाठी भाजपातून तीन नावे पुढे येत आहेत. यामध्ये हिंगणी जि.प. गटाच्या सदस्य चित्रा राणा रणनवरे, पोहणा गटाच्या सदस्य माधुरी चंदनखेडे आणि नारा गटाच्या सदस्य चेतना मानमोडे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. यामध्येही कोणाची वर्णी लावायची यावर भाजपात विचार मंथन सुरु असल्याची माहिती आहे. तीन सदस्यांपैकी चित्रा रणनवरे यांचे नाव अग्रक्रमावर असून या पाठोपाठ माधुरी चंदनखेडे यांच्या नावाची चर्चा आहे. चित्रा रणनवरे यांच्याकडून मात्र सकारात्मक प्रतिसाद अद्याप भाजपश्रेष्ठींना मिळालेला नसल्यामुळेच चंदनखेडे यांचे नावे पुढे आल्याचेही बोलले जात आहे. ही आयती संधी असल्याचे हेरुन आर्वी विधानसभा मतदार संघातील जि.प. सदस्य महिलेला हा बहुमान मिळावा म्हणूनही भाजपातील एक गट पुढे सरसावला आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालावी, असा प्रश्न भाजपश्रेष्ठींना पडला आहेत. आघाडीतर्फेही जि.प.ची सत्ता टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहे. मात्र काही सदस्य संपर्काक्षेत्राबाहेर असल्यामुळे बहुमताचा आकडा जुळविणे हे पहिले आव्हान त्यांच्यापुढे आहे. हा आकडा जुळल्यानंतरच कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालायची याचा विचार होणार असल्याचे आघाडीतील सूत्रांचे म्हणणे आहे. विद्यमान स्थितीत तरी आघाडीत जि.प. ची सत्ता कायम राखण्यावरुन चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे बोलले जात आहे. एका काँग्रेस नेत्याशी चर्चा केली असता ते नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, जि.प. ची सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आघाडीपुढे आहे. पहिल्यांदाच वर्धा जिल्हा परिषदेवर सत्ता कायम राखण्यात यश मिळेल, याची शाश्वती अत्यल्प आहे. आघाडीने आशा सोडली नसलीतरी काही सदस्य फितुर झाल्यामुळे यात कितपत यश येते हे त्याचदिवशी कळेल.(जिल्हा प्रतिनिधी)