शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

भविष्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम निवडा

By admin | Updated: June 22, 2014 00:06 IST

दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे, याबाबत विद्यार्थी तसेच पालकांत संभ्रम निर्माण होतो़ डॉक्टर, इंजिनिअरींगच्या मागे लागून आपले आयुष्य निरस आणि कंटाळवाणे होण्यापेक्षा मला

एज्यूकेशन व करिअर फेअरला प्रारंभ : संजय भागवत यांचे प्रतिपादनवर्धा : दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे, याबाबत विद्यार्थी तसेच पालकांत संभ्रम निर्माण होतो़ डॉक्टर, इंजिनिअरींगच्या मागे लागून आपले आयुष्य निरस आणि कंटाळवाणे होण्यापेक्षा मला कुठे जायचे आहे, हे आधी ठरवा आणि नंतर आपल्या अभ्यासक्रमाची निवड करा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात तीन दिवसीय एज्यूकेशन व करिअर फेअरचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म़ गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती प्रा़ गिरीश्वर मिश्र तर अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पीआरएसआयचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार राय, प्रदीप दाते आदी उपस्थित होते़ विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसेच करिअर निवडीबाबत एज्यूकेशन व करिअर फेअरच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भागवत यांनी केले़ रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून यासाठी क्षमतावृद्धीसारखे अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत विशेष कार्यक्रम तयार केला आहे़ यात औद्योगिक समुहांना आवश्यक असणारे दीड हजार क्षमतावृद्धी संदर्भातील विषय निश्चित केले आहे. यामुळे भविष्याचा वेध घेऊन आपला अभ्यासक्रम ठरवावा, असेही भागवत यांनी सांगितले.कुलपती प्रा़ गिरीश्वर मिश्र यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध पर्याय उपलब्ध असून रोजगार व स्वयंरोजगार सुरू करण्याची संधीसुद्धा उपलब्ध आहे. नवनवीन संधीची माहिती घेऊन त्यास अनुषंगिक अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनीही अशा उपक्रमाच्या माध्यमाचा लाभ घ्यावा. जनसंपर्क ईव्हेंट मॅनेजमेंट यासारखे नवीन दालने विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असून शिक्षण व रोजगार याचा समन्वय ठेवून अभ्यासक्रमाची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी पब्लिक रिलेशन सोसायटी आॅफ इंडियाचे वर्धा शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार राय यांनी एज्यूकेशन व करिअर फेअरच्या आयोजनाबाबत माहिती दिली. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला़ प्रास्ताविक पीआरएसआयच्या वर्धा शाखेचे सचिव बी.एस. मिरगे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष प्रा. प्रफूल्ल दाते यांनी मानले. शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील सेतू बांधण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून होत असून वर्धा जिल्ह्यात सर्वच शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने हा जिल्हा एज्यूकेशन हब म्हणून ओळखला जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)