शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

भविष्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम निवडा

By admin | Updated: June 22, 2014 00:06 IST

दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे, याबाबत विद्यार्थी तसेच पालकांत संभ्रम निर्माण होतो़ डॉक्टर, इंजिनिअरींगच्या मागे लागून आपले आयुष्य निरस आणि कंटाळवाणे होण्यापेक्षा मला

एज्यूकेशन व करिअर फेअरला प्रारंभ : संजय भागवत यांचे प्रतिपादनवर्धा : दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे, याबाबत विद्यार्थी तसेच पालकांत संभ्रम निर्माण होतो़ डॉक्टर, इंजिनिअरींगच्या मागे लागून आपले आयुष्य निरस आणि कंटाळवाणे होण्यापेक्षा मला कुठे जायचे आहे, हे आधी ठरवा आणि नंतर आपल्या अभ्यासक्रमाची निवड करा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात तीन दिवसीय एज्यूकेशन व करिअर फेअरचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म़ गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती प्रा़ गिरीश्वर मिश्र तर अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पीआरएसआयचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार राय, प्रदीप दाते आदी उपस्थित होते़ विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा तसेच करिअर निवडीबाबत एज्यूकेशन व करिअर फेअरच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भागवत यांनी केले़ रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून यासाठी क्षमतावृद्धीसारखे अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत विशेष कार्यक्रम तयार केला आहे़ यात औद्योगिक समुहांना आवश्यक असणारे दीड हजार क्षमतावृद्धी संदर्भातील विषय निश्चित केले आहे. यामुळे भविष्याचा वेध घेऊन आपला अभ्यासक्रम ठरवावा, असेही भागवत यांनी सांगितले.कुलपती प्रा़ गिरीश्वर मिश्र यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध पर्याय उपलब्ध असून रोजगार व स्वयंरोजगार सुरू करण्याची संधीसुद्धा उपलब्ध आहे. नवनवीन संधीची माहिती घेऊन त्यास अनुषंगिक अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनीही अशा उपक्रमाच्या माध्यमाचा लाभ घ्यावा. जनसंपर्क ईव्हेंट मॅनेजमेंट यासारखे नवीन दालने विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असून शिक्षण व रोजगार याचा समन्वय ठेवून अभ्यासक्रमाची निवड करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी पब्लिक रिलेशन सोसायटी आॅफ इंडियाचे वर्धा शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार राय यांनी एज्यूकेशन व करिअर फेअरच्या आयोजनाबाबत माहिती दिली. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला़ प्रास्ताविक पीआरएसआयच्या वर्धा शाखेचे सचिव बी.एस. मिरगे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष प्रा. प्रफूल्ल दाते यांनी मानले. शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील सेतू बांधण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून होत असून वर्धा जिल्ह्यात सर्वच शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने हा जिल्हा एज्यूकेशन हब म्हणून ओळखला जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)