शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदा मुलांची बाजी

By admin | Updated: May 28, 2015 01:38 IST

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल यंदा दोन टक्क्यांनी वाढला असून तो ८८.८६ टक्के लागला आहे.

जिल्ह्याचा निकाल ८८.८६ टक्के : १५ हजार ८०२ पैकी १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल यंदा दोन टक्क्यांनी वाढला असून तो ८८.८६ टक्के लागला आहे. गतवर्षी निकालाची टक्केवारी ८६.४८ इतकी होती. यंदा जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान यंदा जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा येथील अंकित अरविंद लुटे या विद्यार्थ्याने पटकाविला. त्याने ६५० पैकी ६२६ गूण (९६.३१ टक्के) प्राप्त केले. जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयातीलच जय रवींद्र येडलवार हा जिल्ह्यातून दुसरा आला असून त्याला ६५० पैकी ६१५ गुण (९४.६२ टक्के) मिळाले तर जिल्ह्यातून तिसरा येण्याचा तसेच मुलींमधून पहिला येण्याचा मान गांधीग्राम कॉलेज वर्धा येथील अपूर्वा सुनील राठी हिने पटकाविला. तिला ६५० पैकी ६१४ (९४.४८) टक्के गूण मिळाले. पुढच्या करीअरसाठी महत्त्वाची परीक्षा ठरत असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. ती बुधवारी संपली. नागपूर विभागाचा निकाल १ वाजता आॅनलआईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी मुलांची धावपळ सुरू झाली; पण स्मार्टफोनच्या जमान्यात निकाल प्रत्येकाच्या हाती असल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील एकूण १२४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १५ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यापैकी १५ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ५५६ मुले तर ७ हजार ४६५ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९१.९८ टक्के तर मुलांची टक्केवारी ८५.५७ एवढी आहे. त्यामुळे एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची सरशी राहिली. विज्ञान शाखेतून यंदा ५ हजार ६०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ५ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ५ हजार ३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ६ हजार ९८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ६ हजार ९८२ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी ५ हजार ८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत एकूण १ हजार ८८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.