शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

जिल्ह्यात यंदा मुलांची बाजी

By admin | Updated: May 28, 2015 01:38 IST

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल यंदा दोन टक्क्यांनी वाढला असून तो ८८.८६ टक्के लागला आहे.

जिल्ह्याचा निकाल ८८.८६ टक्के : १५ हजार ८०२ पैकी १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल यंदा दोन टक्क्यांनी वाढला असून तो ८८.८६ टक्के लागला आहे. गतवर्षी निकालाची टक्केवारी ८६.४८ इतकी होती. यंदा जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान यंदा जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा येथील अंकित अरविंद लुटे या विद्यार्थ्याने पटकाविला. त्याने ६५० पैकी ६२६ गूण (९६.३१ टक्के) प्राप्त केले. जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयातीलच जय रवींद्र येडलवार हा जिल्ह्यातून दुसरा आला असून त्याला ६५० पैकी ६१५ गुण (९४.६२ टक्के) मिळाले तर जिल्ह्यातून तिसरा येण्याचा तसेच मुलींमधून पहिला येण्याचा मान गांधीग्राम कॉलेज वर्धा येथील अपूर्वा सुनील राठी हिने पटकाविला. तिला ६५० पैकी ६१४ (९४.४८) टक्के गूण मिळाले. पुढच्या करीअरसाठी महत्त्वाची परीक्षा ठरत असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. ती बुधवारी संपली. नागपूर विभागाचा निकाल १ वाजता आॅनलआईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी मुलांची धावपळ सुरू झाली; पण स्मार्टफोनच्या जमान्यात निकाल प्रत्येकाच्या हाती असल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील एकूण १२४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १५ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यापैकी १५ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ५५६ मुले तर ७ हजार ४६५ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९१.९८ टक्के तर मुलांची टक्केवारी ८५.५७ एवढी आहे. त्यामुळे एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची सरशी राहिली. विज्ञान शाखेतून यंदा ५ हजार ६०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ५ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ५ हजार ३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ६ हजार ९८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ६ हजार ९८२ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी ५ हजार ८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत एकूण १ हजार ८८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.