शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

जिल्ह्यात यंदा मुलांची बाजी

By admin | Updated: May 28, 2015 01:38 IST

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल यंदा दोन टक्क्यांनी वाढला असून तो ८८.८६ टक्के लागला आहे.

जिल्ह्याचा निकाल ८८.८६ टक्के : १५ हजार ८०२ पैकी १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल यंदा दोन टक्क्यांनी वाढला असून तो ८८.८६ टक्के लागला आहे. गतवर्षी निकालाची टक्केवारी ८६.४८ इतकी होती. यंदा जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान यंदा जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा येथील अंकित अरविंद लुटे या विद्यार्थ्याने पटकाविला. त्याने ६५० पैकी ६२६ गूण (९६.३१ टक्के) प्राप्त केले. जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयातीलच जय रवींद्र येडलवार हा जिल्ह्यातून दुसरा आला असून त्याला ६५० पैकी ६१५ गुण (९४.६२ टक्के) मिळाले तर जिल्ह्यातून तिसरा येण्याचा तसेच मुलींमधून पहिला येण्याचा मान गांधीग्राम कॉलेज वर्धा येथील अपूर्वा सुनील राठी हिने पटकाविला. तिला ६५० पैकी ६१४ (९४.४८) टक्के गूण मिळाले. पुढच्या करीअरसाठी महत्त्वाची परीक्षा ठरत असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. ती बुधवारी संपली. नागपूर विभागाचा निकाल १ वाजता आॅनलआईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी मुलांची धावपळ सुरू झाली; पण स्मार्टफोनच्या जमान्यात निकाल प्रत्येकाच्या हाती असल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील एकूण १२४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १५ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यापैकी १५ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १४ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ५५६ मुले तर ७ हजार ४६५ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९१.९८ टक्के तर मुलांची टक्केवारी ८५.५७ एवढी आहे. त्यामुळे एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची सरशी राहिली. विज्ञान शाखेतून यंदा ५ हजार ६०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ५ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ५ हजार ३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ६ हजार ९८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी ६ हजार ९८२ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी ५ हजार ८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत एकूण १ हजार ८८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.