शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

चाईल्ड हेल्पलाईन नंबर आता शालेय पुस्तकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 11:47 IST

बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाणार आहे.

ठळक मुद्देएनसीईआरटीचा पुढाकार बाल लैंगिक शोषणाबाबत जागृतीचा मुद्दा

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाणार आहे.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्राने (एनसीईआरटी) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सत्रापासून (२०१८) तिसरीच्या इव्हीएस-एनव्हायरन्मेंटल सायन्स पुस्तकात आणि यानंतर पहिली ते पाचवीच्या भाषा व गणित तसेच चवथी आणि पाचवीच्या पर्यावरणशास्त्र या पुस्तकात समाविष्ट करणार आहे.बाल लैंगिक शोषणाबाबत शालेय विद्यार्थी व शिक्षकांत जागृती व्हावी म्हणून शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल सुचविणारा २५ पानांचा अहवाल डॉ. खांडेकर, अनघा इंगळे, सावित्री, गिरीशा, मोहम्मद कादीर, अन्विता, प्रीती, डॉली, अनुरथी, सुमेध, निखिल व श्रीनिधी दातार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर व एनसीईआरटीला डिसेंबर २०१६ मध्ये पाठविला होता. यावर आतापर्यंत काय कार्यवाही केली, अशी विचारणा आरटीआय अंतर्गत केली होती. यावर एनसीईआरटी शैक्षणिक विभागाच्या डीन प्रा. सरोज यादव यांनी १४ जून रोजी प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर यांना दिली.

काय आहे चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८१०९८ हा टोल फ्री टेलि-हेल्पलाईन नंबर चाईल्ड हेल्पलाईन नंबर म्हणून चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने १९९६ मध्ये तयार केला होता. संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ही भारतातील एकमेव व सर्वांत व्यापक अशी २४ तास चालू असणारी फोन सेवा आहे. ही सेवा देशातील ३६६ शहरांत, जिल्ह्यांत तसेच ३४ राज्यात कार्यरत आहे. राज्याच्या शालेय विभागानेही यावर सकारात्मक विचार करावा म्हणून डॉ. खांडेकर राज्य शासनाशी पत्रव्यवहार करीत आहेत.

एनसीईआरटीचे हे पाऊल शाळा व इतर शैक्षणिक केंद्रांना सुरक्षित जागा बनविण्यास मदत करेल. यामुळे मुलांना स्वत:ची सुरक्षा तसेच तक्रार करण्याच्या माध्यमाची माहिती होईल. घटना घडल्यास योग्य ठिकाणी मदत घेण्याची शक्ती विद्यार्थी, शिक्षक व पालकांत निर्माण होईल. मुलांची शालेय पुस्तके विद्यार्थी, शिक्षकांसह पालकही वाचत असतात. यामुळे एनसीईआरटीचे हे पाऊल बाल लैंगिक शोषण कमी करण्यात मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता.- प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यकशास्त्र, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र