शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

‘समृद्धी’च्या पुलाखाली चिखल विरूळ-रसुलाबाद मार्ग झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : रसुलाबाद, विरुळ रस्त्याच्या मधोमध समृद्धी महामार्ग गेल्याने पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे पुलाखाली चिखल साचला असल्याने विरुळ ते रसुलाबाद हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत. शेतात बैलबंडी नेण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने पुलाखालील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा, अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांतून केली जात आहे.

नाल्याच्या पुरामुळे टेंभरी - परसोडीचा संपर्क अडचणीत- विरूळ (आकाजी) : मुसळधार पावसामुळे परसोडी - टेंभरी गावाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या पुलाला पूर आल्याने काही काळ दोन्ही गावांचा संपर्क शुक्रवारी तुटल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतातील मजूर, नागरिक, विद्यार्थी यांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. पावसाळ्यात नेहमीच मुसळधार पावसामुळे या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. संबंधित प्रशासनाला येथील ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली. परंतु, ग्रामस्थांच्या या मागणीला संबंधित विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी येथील सरपंच सुरेखा पंढरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग