शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘समृद्धी’च्या पुलाखाली चिखल विरूळ-रसुलाबाद मार्ग झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : रसुलाबाद, विरुळ रस्त्याच्या मधोमध समृद्धी महामार्ग गेल्याने पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे पुलाखाली चिखल साचला असल्याने विरुळ ते रसुलाबाद हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.रसुलाबाद ते विरुळ रस्त्यावर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली. यामुळे नागरिकांना पुलाखालील बोगद्यातून विरुळ आणि रसुलाबाद येथे जावे लागते. मात्र, पुलाखाली पावसाचे पाणी साचून चिखल साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. चिखल असल्यामुळे नागरिकांना वाहने बंद करून हातात धरुन न्यावी लागत आहेत. शेतात बैलबंडी नेण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने पुलाखालील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा, अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांतून केली जात आहे.

नाल्याच्या पुरामुळे टेंभरी - परसोडीचा संपर्क अडचणीत- विरूळ (आकाजी) : मुसळधार पावसामुळे परसोडी - टेंभरी गावाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या पुलाला पूर आल्याने काही काळ दोन्ही गावांचा संपर्क शुक्रवारी तुटल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतातील मजूर, नागरिक, विद्यार्थी यांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. पावसाळ्यात नेहमीच मुसळधार पावसामुळे या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. संबंधित प्रशासनाला येथील ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊन या रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली. परंतु, ग्रामस्थांच्या या मागणीला संबंधित विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी येथील सरपंच सुरेखा पंढरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग