शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना अळीयुक्त कापूस बोंडाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 22:02 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,...

ठळक मुद्देप्रहार संघटनेची मागणी : शेतकºयांना एकरी २५ हजाराची मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळ जगताप यांनी गुरुवारला तहसीलदार विजय पवार यांना दिला. यावेळी त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनासह अळीयुक्त कापूस बोंडाची भेट पाठविण्यात आली आहे.अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात जे खचले त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, तर अनेकांनी या संकटासोबत लढा देण्याचा निर्धार केला. आता शेतकºयांपुढे बोंडअळीचे नवीन जैविक संकट उभे ठाकले आहे. शेकडो शेतकºयांचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त केले. एकरी २० ते २५ क्विंटल कापूस व्हायला पाहिजे होता तेथे दोन-चार क्विंटल उत्पादन होणे कठीण झाले. परिणामी कापूस लागवडी पासून वेचाईपर्यंतचा झालेल्या खर्चाची परतफेड कशी करावी आणि देणदारांचे देणे कसे फेडावे तसेच परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा बिकट प्रश्न निर्माण झाला.या संकटातून शेतकºयांना सोडविण्याकरिता शासनाने मंगळवार पूर्वी पाहणी करून बोंडअळी ग्रस्त शेतकºयांना रोखीने २५ हजार रुपयाची मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी प्रहार सोशल फोरमच्यावतीने निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.प्रहार संघटनेने यापूर्वी सन २००९ मध्ये धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्याकरिता विषप्राशन आंदोलन केले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता याचीच पुनरावृती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.आर्वी तालुक्यात कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला. कर्जमाफीच्या आशेत शेतकºयांनी बँकेतून कर्ज न घेता उसणवारीवर कपाशीची लागवड केली. यात आता उत्पन्न येणार नसल्याचे चिन्ह असल्याने शेतकºयांची चांगलीच अडचण झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :cottonकापूस