शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रवीण देशमुख : शिवजयंतीनिमित्त व्याख्यानमाला; वर्धेकरांची मोठी उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष ओंकार धावडे, कार्यकारी अभियंता रवींद्र वºहाडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ वानखेडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता संदीप हासे, उपविभागीय अभियंता संजय मंत्री, सहाय्यक अभियंता संजय मानकर, पोलीस निरीक्षक धनाजी जळक, मोहन वडतकर, कोटंब्याच्या सरपंच रेणुका कोटंबकार, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष योगिता इंगळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीरज बुटे, विधी व न्याय परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कपिल गोडघाटे उपस्थित होते. वैष्णवी भोयर, रिंकू भोयर यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.प्रा. देशमुख म्हणाले, युद्धप्रसंगी कुराण, बायबल अथवा कुठलाही धर्मग्रंथ सापडल्यास सन्मानपूर्वक जतन करण्याचे महाराजांचे आदेश होते. मात्र, आज देशात महाराजांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध काम सुरू असून धर्म आणि जातीत फूट पाडण्याचे काम सुरू आहे. शिवराय हे पर स्त्रीला मातेसमान मानत असत, याचा संदर्भ संत तुकाराम महाराजांच्या अभंगात असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी विश्व हिंदी विद्यापीठाचे जीवन कोडापे, प्रकाश वानखेडे, भूषण तुरणकर यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर पोवाडा सादर केला. तर ‘शिवरायांची शौर्यगाथा’ ही नाटिका लखोटिया भुतडा विद्यालय कोंढाळीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर गिºहे तर संचालन अनिता येवले व अनिकेत जाधव यांनी केले. आभार किशोर जगताप यांनी मानले. कार्यक्रमास मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला वर्धेकर नागरिकांची मोठी उपस्थिती उपस्थिती होती. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज