शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक फवारणीयुक्त भाज्या आरोग्यास धोकादायक

By admin | Updated: July 8, 2014 23:37 IST

भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यावर विविध रासायनिक औषधींची फवारणी केली जाते. त्यामुळे या भाजीपाल्यातील पौष्टीकता नष्ट होत आहे. या भाज्या मानवी शरीरासाठी घातक ठरत

वर्धा : भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यावर विविध रासायनिक औषधींची फवारणी केली जाते. त्यामुळे या भाजीपाल्यातील पौष्टीकता नष्ट होत आहे. या भाज्या मानवी शरीरासाठी घातक ठरत असल्यामुळे अशा भाज्या खाणेच आता धोकादायक झाले आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक रासायनिक फावारणी औषधे विकायला आहेत. यातील अनेक कंपन्या आपली औषधे अतिशय चांगली आणि कुठल्याही प्रकारे हानीकारक नसल्याचा दावा करतात. त्याचप्रकारे अमक्या वाणावर हे औषध किती प्रभावी आहे. या रोगांवर हेच औषध फवारा अशा जाहिराती जागोजागी लटकलेल्या किंवा औषधांच्या दुकानात दिसतात. त्याची सत्यता कोणीच पडताळून पहात नाही. बाजारात सध्या बोगस औषधांचा साठा वाढत आहे. तसेच तपासणी करणारी सरकारी यंत्रणाही याकडे विशेष लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे दुकानदारही बोगस व जादा कमिशन असलेली औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. शेतकऱ्याला यामध्ये नेमके मार्गदर्शन होत नाही. कृषी अधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी ते करणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही. काही शेतकऱ्यांना मेळाव्यात परिसंवादात मार्गदर्शन करीत असताना त्यात विशिष्ट औषधांची व खतांची शिफारस करण्यासाठी ते कंपन्याची औषधे वापरण्यास सांगत असतात. पण एका चर्चासत्रात अमूक औषध वापरा, तर दुसऱ्या चर्चासत्रात तिसऱ्याच कोणत्या तरी औषधाबाबत सांगितले जाते. शेतकऱ्यांना या बाबी माहित नसतात. ते या मार्गदर्शकांवर विश्वास ठेवतात . त्याचप्रकारे औषध किती व कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक दिले जातेच असे नाही. अशा वेळी कीड पाहून शेतकरी जास्त औषधाची फवारणी करतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अशा भाज्या खाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनाही रासायनिक औषधांऐवजी परंपरागत गोमूत्र फवारण्यासारखे उपाय करुन नेहमी योग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. शेतीशी काडीमात्र संबंध नसलेल्या मंडळीकडून मार्गदर्शन घेताना जागृत राहण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनाही अशा भाज्या स्वच्छ करून खाण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)