शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
5
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
6
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
7
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
8
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
9
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
10
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
11
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
12
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
13
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
14
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
15
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
16
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
17
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
18
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
19
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
20
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल

रासायनिक फवारणीयुक्त भाज्या आरोग्यास धोकादायक

By admin | Updated: July 8, 2014 23:37 IST

भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यावर विविध रासायनिक औषधींची फवारणी केली जाते. त्यामुळे या भाजीपाल्यातील पौष्टीकता नष्ट होत आहे. या भाज्या मानवी शरीरासाठी घातक ठरत

वर्धा : भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यावर विविध रासायनिक औषधींची फवारणी केली जाते. त्यामुळे या भाजीपाल्यातील पौष्टीकता नष्ट होत आहे. या भाज्या मानवी शरीरासाठी घातक ठरत असल्यामुळे अशा भाज्या खाणेच आता धोकादायक झाले आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक रासायनिक फावारणी औषधे विकायला आहेत. यातील अनेक कंपन्या आपली औषधे अतिशय चांगली आणि कुठल्याही प्रकारे हानीकारक नसल्याचा दावा करतात. त्याचप्रकारे अमक्या वाणावर हे औषध किती प्रभावी आहे. या रोगांवर हेच औषध फवारा अशा जाहिराती जागोजागी लटकलेल्या किंवा औषधांच्या दुकानात दिसतात. त्याची सत्यता कोणीच पडताळून पहात नाही. बाजारात सध्या बोगस औषधांचा साठा वाढत आहे. तसेच तपासणी करणारी सरकारी यंत्रणाही याकडे विशेष लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे दुकानदारही बोगस व जादा कमिशन असलेली औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. शेतकऱ्याला यामध्ये नेमके मार्गदर्शन होत नाही. कृषी अधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी ते करणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही. काही शेतकऱ्यांना मेळाव्यात परिसंवादात मार्गदर्शन करीत असताना त्यात विशिष्ट औषधांची व खतांची शिफारस करण्यासाठी ते कंपन्याची औषधे वापरण्यास सांगत असतात. पण एका चर्चासत्रात अमूक औषध वापरा, तर दुसऱ्या चर्चासत्रात तिसऱ्याच कोणत्या तरी औषधाबाबत सांगितले जाते. शेतकऱ्यांना या बाबी माहित नसतात. ते या मार्गदर्शकांवर विश्वास ठेवतात . त्याचप्रकारे औषध किती व कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक दिले जातेच असे नाही. अशा वेळी कीड पाहून शेतकरी जास्त औषधाची फवारणी करतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अशा भाज्या खाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनाही रासायनिक औषधांऐवजी परंपरागत गोमूत्र फवारण्यासारखे उपाय करुन नेहमी योग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. शेतीशी काडीमात्र संबंध नसलेल्या मंडळीकडून मार्गदर्शन घेताना जागृत राहण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनाही अशा भाज्या स्वच्छ करून खाण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)