शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शेती व्यवस्थेमध्ये बदल घडणे गरजेचे

By admin | Updated: March 14, 2016 02:15 IST

शेती व्यवस्थेत जोपर्यंत बदल घडत नाही व अंमलात येत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला पोषक ठरणार नाही.

अविनाश आदिक : गोजी येथील कृषी प्रदर्शनाचा समारोपवर्धा : शेती व्यवस्थेत जोपर्यंत बदल घडत नाही व अंमलात येत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला पोषक ठरणार नाही. केंद्र, राज्य शासनाने प्रश्न सोडविण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन एस.टी. कामगार काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र कृषक समाजाचे सदस्य अविनाश आदिक यांनी केले.महाराष्ट्र कृषक समाज व श्रीक्षेत्र मालखोदी महादेव देवस्थान यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित गोजी (जामणी) येथील कृषी व पशु प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब गावंडे यवतमाळ, कृषक समाज अध्यक्ष अनुराधा आदिक, कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक बाबाराव झलके, स्वाती देशमुख, प्रा. स्वप्नील देशमुख, माजी जि.प. सदस्य जिजा राऊत, माजी पं.स. सभापती शरयू वांदिले, बेबी वानखेडे, चंदा वानखेडे, संजय काकडे आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस हवामान बदलत आहे. त्याचा शेतीव्यवस्थेवर परिणाम होत आहे. हे गांभीर्य लक्षात घेत काम केले पाहिजे. महाराष्ट्र कृषक समाज संघटना राजकीय उद्देशाने पूढे आली नाही. दिवंगत गोविंदराव आदिक यांनी सरकारमध्ये असताना शासनाविरूद्ध शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले. कृषक समाजही शेतकऱ्यांकरिता कार्यरत राहणार आहे, असे ग्वाहीही अविनाश आदिक यांनी दिली. गावंडे यांनी देशातील प्रत्येक गावात रेल्वे पोहोचत नाही तरी रेल्वेचा अर्थसंकल्प आहे; पण भारत कृषीप्रधान देश असताना कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प नाही, अशी खंत व्यक्त केली. राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्तीच मृत झाली असून शेतकऱ्यांना क्रांतीशिवाय पर्याय नाही, असे परखड मतही त्यांनी मांडले. प्रास्ताविकातून काकडे यांनी गोविंद आदिक यांच्या ११ कलमी सनदेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांची सुत्ररूपाने मांडणी व उपाययोजना होती; पण सरकारने दुर्लक्ष केल्याने आता शेतकरी आत्महत्येने जटील स्वरूप धारण केले आहे. ही तीव्रता कमी करायची झाल्यास डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे गरजेचे आहे, असे सांगितले. प्रा. देशमुख व स्वाती देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. संचालन संजय काकडे यांनी केले तर आभार पांडुरंग देवतळे यांनी मानले. कार्यक्रमाला विनोद पांडे, अंबादास वानखेडे, प्रमोद पिंपळे आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)