शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

प्रसादासाठी प्रमाणपत्र अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:14 IST

जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो. उत्सवादरम्यान शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसाद तयार होत असताना आयोजकांकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देविषबाधेच्या घटना टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाप्रसाद वितरणातून विषबाधेसारख्या अप्रिय घटना घडू शकतात. विना नोंदणी अन्न पदार्थांचे वितरण कायद्याने गुन्हा असल्याने गणेशोत्सव मंडळे, संस्था, व्यक्तींना अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या नियमान्वये नोंदणी करणे अन्न व औषध प्रशासन विभागाने आता अनिवार्य केले आहे.जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो. उत्सवादरम्यान शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसाद तयार होत असताना आयोजकांकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे विषबाधेसारख्या अप्रिय घटना घडू शकतात. यापूर्वी अन्य जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.याकरिता गणेशोत्सव मंडळे, संस्था, व्यक्ती यांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता कोणत्याही आधार केंद्रातून किंवा सर्व सेवा केंद्रातून (सीएससी) किंवा ६६६.  www. foodlicensing. fassao.gov.in  या संकेतस्थळावर अन्नसुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत कायदा २००६, नियम व नियमन २०११ अन्वये नोंदणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.गणेश मंडळांसाठी या आहेत सूचनाप्रसाद तयार करताना स्वयंपाक तयार करण्याची जागा स्वच्छ, नीटनेटकी व आरोग्यदायी असावी. प्रसाद तयार करताना कुठलेही कीटक त्यात पडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रसादाकरिता लागणारा कच्चा माल , अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करावे, त्याबाबतचे पक्के देयक घ्यावे. भांडी स्वच्छ, नीटनेटकी व झाकण असलेली असावी. शिल्लक राहिलेल्या प्रसादाचा पुनर्वापर दुसऱ्यादिवशी करू नये. कढी किंवा आमटीसारखे अन्नपदार्थ कल्हई न केलेल्या पितळी भांड्यात तयार करू नये, फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या परवाना, नोंदणीधारकाकडून करावी. प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री करावी, प्रसाद तयार करणाºया स्वयंसेवकास अ‍ॅप्रॉन ग्लोव्हज, टोपी आदी पुरवावे, प्रसाद उत्पादन, वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठलाही त्वचा रोग व संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी, प्रसादाकरिता खोवा, मावा यासारख्या नाशवंत पदार्थांचा वापर होत असल्यास ताजा असल्याची खात्री करावी. जुना, शिळा अनेक दिवस शीतपेटीत ठेवलेला मावा प्रसादासाठी वापरू नये. प्रसाद तयार करणाºया मंडळांनी कच्च्या मालाचे देयक कॅटरर्स, स्वयंपाकी, स्वयंसेवक, प्रसाद वितरण करणाऱ्या स्वयंसेवकाचे नाव, संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक माहिती लिहून ठेवावी. तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून सहकार्य करीत त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019