शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारची भूमिका संविधानाविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

जगातील विद्यापीठात गांधीजींवर अभ्यास केला जात आहे. पुतळे उभारण्यात आलेले आहे. बराक ओबामा म्हणतात ‘मी गांधीजीमुळे अमेरिकेचा अध्यक्ष बनलो’ तर नेल्सन मंडेला गांधीजींचे नाव घेतात पण; त्याच गांधीजींना त्यांच्याच देशात तिरस्कार मिळत आहे. नरेंद्र मोदी ज्या शाळेत शिकले त्याचा आता द्वेष करण्यात येत आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधीजी म्हणत ते चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर ठेवण्यात आले. गांधीजी कधीही मरु शकत नाही.

ठळक मुद्देमहादेव विद्रोही : सर्व सेवा संघ व सर्वोदय समाजाच्यावतीने सेवाग्राम येथे उपवास सत्याग्रह

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सर्व धर्म समभाव आपल्या जीवनातून सांगितला होता. त्याच देशातील नागरिकांना आता येथील नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागत आहे. असा प्रसंग बापूंसोबत दक्षिण आॅफ्रिकेत घडला होता. तेथील कायद्याच्या विरोधात बापूंनी सत्याग्रह केला होता. त्यात त्यांना यशही मिळाले होते. आज तिच वेळ भारतीयांवर आलेली आहे. नागरिक असल्याचे सिद्ध करा; अन्यथा डिटेंशनमध्ये जावे लागेल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. सरकारची ही भूमिका नागरिकांच्या व संविधानाविरोधात आहे, असा आरोप सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी केला. तसेच नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सर्व सेवा संघाने न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही सांगितले.महात्मा गांधीजींच्या ७२ व्या पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अपमान, नागरिकता संशोधन कानून, एन.आर.सी. तसेच एन.पी.आर.च्या विरोधात सेवाग्राम येथे सर्व सेवा संघ व सर्वोदय समाजाच्यावतीने उपवास सत्याग्रह आणि जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना महादेव विद्रोही बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश खैरनार, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू, गांधी सेवा संघाचे अध्यक्ष कनकमल गांधी, इक्राम हुसैन, राजेंद्र शर्मा, डॉ. शिवचरण ठाकूर, मुकुंद मस्के, अशोक शरण आदींची उपस्थिती होती. सकाळी ९ वाजता या उपवास सत्याग्रहाला सुरुवात झाली असून प्रारंभी भजने व गीत सादर करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे म्हणाले, जगातील विद्यापीठात गांधीजींवर अभ्यास केला जात आहे. पुतळे उभारण्यात आलेले आहे. बराक ओबामा म्हणतात ‘मी गांधीजीमुळे अमेरिकेचा अध्यक्ष बनलो’ तर नेल्सन मंडेला गांधीजींचे नाव घेतात पण; त्याच गांधीजींना त्यांच्याच देशात तिरस्कार मिळत आहे. नरेंद्र मोदी ज्या शाळेत शिकले त्याचा आता द्वेष करण्यात येत आहे. मजबुरी का नाम महात्मा गांधीजी म्हणत ते चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर ठेवण्यात आले. गांधीजी कधीही मरु शकत नाही. साध्वीने गोळ्या मारल्या तरीही गांधी मेले नाही. जगाला प्रेम, सत्य, अहिंसा पाहिजे यासाठी गांधीजी पाहिजे आहे, असेही चंद्रकांत वानखेडे म्हणाले. सुरेश खैरनार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आज सर्व लोक प्रथमच घराबाहेर पडून सत्याग्रह करीत आहेत. यातून जागृतीचे काम घडत आहे. सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी लोकांचे लक्ष वळविण्याकरिता हा उद्योग सुरु केला आहे. सरकारी सर्व उद्योगाचे खाजगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला आहे. देशात अनेक समस्या आहेत, त्याकडे लक्ष नाही. निवडणूकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यात सरकारला अपयश आले आहे. यांची वृत्ती ही हिटलरशाहीची असून तेच खऱ्या अर्थाने देशद्रोही आहेत, अशी घाणाघाती टिका खैरनार यांनी केली. गांधीजींच्या पुण्यतिथीला या कायद्याच्या विरोधात उपवास करण्यात आला असून हा गांधींचा सत्याग्रह आहे. आता सर्वांनी घराबाहेर पडावे. यातूनच आशेचा किरण निर्माण होईल, असे आवाहन उपस्थितांनी मार्गदर्शनातून केले. सर्वधर्म प्रार्थनेने या कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन अविनाश काकडे यांनी केले.तिरंगा हातात घेऊनच लढाई लढावी लागेल - फिरदोस मिर्झागांधीजींनी सत्याग्रह करून नोंदणी कायदा मागे घेण्यास भाग पाडले होते. आज तेच आपल्या देशात घडत आहे. संविधानाने येथील नागरिकांना सर्व हक्क व अधिकार दिले आहे पण; नव्या सरकारच्या कायद्याने मात्र नेमके कोण, कुठले नागरिक हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब लोकांना बसणार आहे, मग तो कोणत्याही जाती, धर्माच असू द्या. सरकारने स्वत:चे अपयश लपविण्याकरिता नोटबंदी, जीएसटी आणि आता नागरिकता संशोधन कायदा अंमलात आणला आहे. यातून नागरिकांना केवळ अडकवून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. लोकं कागदपत्रांच्या मागे लागतील पण; ही गोष्ट एवढी सोपी नाही. आसामचा विचार केला तर सरकारी यंत्रणा आणि कागदपत्रे गोळा करण्याचा खर्च किती होईल, याचा हिशोब अवाक्याच्या बाहेर आहे. लोकांना पुराव्यानिशी नागरिकत्व सिध्द करावे लागेल. आजही केवळ ५८ टक्के लोकांच्या जन्माची नोंद आहे. मग उरलेल्यांचे काय? असा प्रश्न अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी उपस्थित केला आहे. प्लास्टिकचे उदाहरण घेतल्यास बंदीचा फटक प्लास्टिक वेचणाऱ्यांना बसला. त्यांच्या हाताचे काम हिरावल्या गेले.सरकारी उद्योग विकल्या जात आहे. आर्थिकदृष्ट्या देश कमकुवत होत आहे. त्यामुळे आता मुसलमानांचाच प्रश्न नाही तर तिरंगा हातात घेऊन सर्वांनाच लढाई लढावी लागणार आहे, असेही अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी सांगितले.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामMahatma Gandhiमहात्मा गांधी