शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

केंद्रीय समितीकडून रस्त्यांची चौकशी सुरू

By admin | Updated: December 29, 2014 23:47 IST

मागील पाच वर्षांत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. यानुसार सोमवारी

तीन दिवस मुक्काम : पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील भ्रष्टाचार खणून काढणार?वर्धा : मागील पाच वर्षांत पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या रस्ते बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. यानुसार सोमवारी तीन सदस्यीय समितीच वर्धेत पाठविली आहे. ही समिती स्थानिक अधिकाऱ्यांनाच सोबत घेऊन चौकशी करीत असल्यामुळे योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस यईल, याबाबत पहिल्याच दिवशी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. समितीने हिंगणघाट तालुक्यातील रस्त्यांची चौकशी केली.समिती वर्धेत येत असल्याची बाब खा. रामदास तडस यांना केंद्राकडून कळली. स्थानिक विभागाने मात्र त्यांच्यापासून ही माहिती दडवून ठेवली. हिवाळी अधिवेशनात खा. तडस यांनी शून्य प्रहरात विदर्भात आणि वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत मागील पाच वर्षांच्या कालावधीत रस्त्यांची कामे करण्यात आली. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची बाब केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याची केंद्र शासनाकडून गंभीर दखल घेण्यात येईल, तसेच अधिवेशन संपताच तीन सदस्यीय समितीमार्फत सर्व रस्त्यांची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यामुळे अधिवेशन संपण्याकडे तक्रार कर्त्यांचे लक्ष होते. अधिवेशन संपताच दिलेल्या आश्वासनानुसार ही समिती वर्धेत दाखल झाली. यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील स्थानिक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सर्व अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वी बंद करून ठेवले आहे. सदर समिती नेमकी कोणत्या रस्त्यांची चौकशी करीत आहे. याबाबत खासदार तडस यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. सूत्रनुसार ही समिती पहिल्याच दिवशी हिंगणघाट तालुक्यात पोहचली. बोरगाव ते पारडी या मार्गाची तपासणी करण्यात आली. नंतर समुद्रपुरातील काही मार्गांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. ही समिती अधिकाऱ्यांच्या संगणमताने रस्त्यांची चौकशी करीत असल्यामुळे केवळ औपचारिकता पूर्ण करते वा भ्रष्टाचार खणून काढते, याकडे लक्ष लागले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने चौकशी जुन्या केंद्र सरकारच्या काळात वर्धा जिल्ह्यातील पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवरुन केंद्रीय पथक चौकशीसाठी आले होते; मात्र या समितीने नाममात्र चौकशी केली होती. त्यामुळे वास्तविकता पुढे आली नाही.सदर प्रकरण पुन्हा नव्या सरकारात पुढे आले. यानुसार शासनाने पुन्हा एक समिती नेमून वर्धेत पाठविली आहे. या समितीत तीन सदस्य आहे. समितीबाबत स्थानिक विभागाने तक्रार करणारे खा. रामदास तडस यांनाच अंधारात ठेवले आहे. त्यामुळे हा विभाग समितीला चांगले रस्ते दाखवून मोकळा होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.