शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

स्मशानभूमी सौंदर्यीकरणापासून दूरच

By admin | Updated: March 29, 2015 02:12 IST

शहरातील स्मशानभूमीच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्मशानभूमीची दुरवस्था कायम आहे. यासाठी शासनाने निधी देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

सेलू : शहरातील स्मशानभूमीच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्मशानभूमीची दुरवस्था कायम आहे. यासाठी शासनाने निधी देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. सोयी सुविधा नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो.तालुक्यातील बहुतांश स्मशानभूमी नदीच्या व नाल्याच्या काठावर आहेत. काही ठिकाणी शेतात अंत्यविधी कार्यक्रम पार पाडले जातात. शासनाने गत १० वर्षांत स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अंत्यविधी पार पाडण्याकरिता शेडची व्यवस्था केली. पण यातील बहुतेक शेडचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने त्यांनी दुरावस्थेकडे वाटचाल सुरू आहे. सौंदर्यीकरणासाठी शासनाचा निधी मिळत नसल्याने मृतावर अंतिम संस्कार करतेवेळी उपस्थित राहणाऱ्या चाहत्यांना सावली व बसण्याची व्यवस्था नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.नदी व नाल्याच्या काठावर गावा शेजारी असलेल्या स्मशानभूमीला गोदरीमुक्त करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला अपयश येत असून कुठेही तारेचे कुंपण आढळून येत नाही. आजूबाजूला झाडे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात साावलीचा आसरा मिळणेही कठीण जाते, तर पावसाळ्याच्या दिवसात प्रेत जाळताना अदचणी येतात. ग्रामीण भागातील स्मशानभूमी सोयी-सुविधायुक्त व्हावी, सौंदर्यीकरण केल्या जावे, किमान पाण्याची तरी सोय करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक नेहमीच संताप व्यक्त करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)