शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सिमेंट मार्गाची दैनावस्था

By admin | Updated: June 12, 2017 01:48 IST

गावातील मुख्य रस्ता व पालखी दिंडी मार्ग म्हणून ओळख असलेल्या सिमेंट रस्त्याची सध्या दैनावस्था झाली आहे.

रस्ता नूतनीकरणाची गरज : पावसाळ्यात येते तळ्याचे स्वरूपलोकमत न्यूज नेटवर्कघोराड : गावातील मुख्य रस्ता व पालखी दिंडी मार्ग म्हणून ओळख असलेल्या सिमेंट रस्त्याची सध्या दैनावस्था झाली आहे. त्याची दुरूस्ती करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाला तळ्याचे स्वरूप येते. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन योग्य कार्यवाहीची मागणी आहे.प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या गावात रामनवमी यात्रेला तर संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघणारा पालखी सोहळा ज्या मार्गाने जाते तो ग्रा.पं.कार्यालय ते जगनाडे मंदिर चौक व विठ्ठल रूखमाई मंदिर या रस्त्याचे २० वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून त्या रस्त्याचे नुतणीकरण केले नसल्याने जागोजागी खड्डे पडले आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजू रस्त्यापेक्षा उंच केल्याने पावसाचे पाणी नालीत वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. थोडा जरी पाऊस आला तरी या खड्ड्यात पाणी साचते. पावसाळ्यात या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर रस्त्याचे नव्याने सिमेंटीकरण करण्यासाठी शासकीय निधी मिळाल्याचा गवगवा झाला होता. याकडे खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून या रस्त्याचे सिमेंटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास प्रतीपंढरीतील हा पालखी मार्ग खड्डेमय व जलमय राहणार नाही, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. ग्रा.पं. भवन बांधकामासाठी कर्ज रूपात निधी मिळाला तर असंख्य भाविकांचे पदकमल ज्या रस्त्याला लागतात. त्या रस्त्याच्या नुतनीकरणासही निधी घ्यावा, अशी मागणी आहे. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर चिखल तयार होतो. बऱ्याच दिवस रस्त्यावरील पाणी वाहून जात नाही. वेळोवेळी पाऊस झाल्यास रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, रस्त्यावरील खड्ड्यांचाही अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताची भीती राहत असल्याने योग्य कार्यवाहीची गरज आहे.अपघाताची भीतीग्रामपंचायत कार्यालय ते विठ्ठल रुखमाई मंदिर दरम्यानच्या सिमेंट रस्त्यावर पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचते. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा सहन अंदाज येत नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्याचप्रमाणे या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. वाहन अनियंत्रित होण्याची भीती नेहमीच असते. नागरिकांसह वाहनचालकांची समस्या लक्षात घेता योग्य कार्यवाहीची मागणी आहे.