शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शहरातील सीसीटीव्ही ठरताहेत कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:06 IST

शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहरात १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले. सदर ५४ सीसीटीव्ही लावण्यासाठी शासनाचा तब्बल ८७ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही अपयश येत आहे.

ठळक मुद्दे८७ लाखांचा झाला खर्च : गुन्हेगारांचा शोध घेण्यातही येतेय अपयश

भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहरात १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले. सदर ५४ सीसीटीव्ही लावण्यासाठी शासनाचा तब्बल ८७ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही अपयश येत आहे. परिणामी, तात्काळ योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.बुधवार १६ जानेवारीला दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शहरातील दोन ठिकाणी स्कूटरस्वार लुटारुदांपत्याने किरकोळ साहित्य घेण्यासाठी दोन हजाराची नोट देऊन मिळालेले पैसे व आपली दोन हजाराची नोट घेऊन पळ काढण्याच्या घटना घडल्या. संत तुकडोजी वाडॉतील कलोडे सभागृहासमोरील माया मनोहर ब्राह्मणवाडे यांचे किरायाच्या दुकानात या दाम्पत्याने दोन हजाराची नोट देत १०० रुपयांच्या भांड्यांची खरेदी केली. शिवाय १,९०० रुपये परत घेतले. त्यानंतर हो नाही करत दोन हजाराची नोट व १ हजार ९०० रुपये तसेच भांडी घेवून दुचाकीने यशस्वी पळ काढला. तर अर्ध्या तासाने याच दांम्पत्याने कारंजा चौकातील टिनाचे दुकानात वृद्ध महिलेला दोन हजाराची नोट देऊन ३३५ रुपयांची रंगीत फायबर शीट खरेदी करून १ हजार ७६५ रुपये परत घेतले. परंतु, साहित्य परत करण्याचा कांगावा करून दोन हजारांची नोट परत मिळविली. तसेच तेथून पळ काढला. या दोन्ही दुकादारांनी लहान रक्कम म्हणून पोलिसात तक्रार केली नाही; पण घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात प्रशांत भाईमारे व सहकाऱ्यांनी गंडा घालणाºयांचा शोध सुरू केला आहे. परंतु, त्यानाही अनेक अडचणी येत आहेत.केवळ एक तासाच्या स्टोअरेजची क्षमतासदर घटनेनंतर ठगबाजांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रिकरण मिळवत ते तपासले. परंतु, केवळ एक तासाच्या स्टोअरेजची क्षमता असल्याने पोलिसांच्या हातीही काहीच लागले नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोण केंद्रस्थानी ठेवून जास्त स्टोअरेज क्षमतेची तसेच अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी आहे.आमदारांच्या प्रयत्नाअंती मिळाला निधीशहरातील छोट्या-छोट्या हालचालींकडे लक्ष ठेवत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावा या हेतूने आ. समीर कुणावर यांच्या प्रयत्नाअंती ५४ सीसीटीव्ही बसविण्यासाठी ८७ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. उशीरा का होईना मुंबईच्या एका एजंसीला कंत्राट देऊन आॅगस्ट २०१८ मध्ये कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. तीन महिन्यात कामपूर्ण करण्याचा करार असताना सहा महिने होऊन सुद्धा काम पूर्ण झाले नाही. शहरात १५ ठिकाणी कॅमेरे लागले आहेत. पण एका ठिकाणचे काम शिल्लक आहे, हे विशेष.फलक ठरतोय अडथळाशहरातील कारंजा चौकात सीसीटीव्ही बसविण्यात आला आहे. परंतु, नगरपालिकेच्यावतीने लावण्यात आलेल्या स्वच्छच्या जनजागृतीच्या फलकामुळे सीसीटीव्हीच्या कॅमेरे झाकोळले गेले आहेत. यामुळेच कॅमेऱ्यांच्या चित्रिकरणात अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी न.प.द्वारे कुठलाही फलक लावण्यास मनाई करण्यात आल्याचा सूचना फलकदेखील लावण्यात आला आहे. फलक लावून पालिकेनेच नियमाची पायमल्ली केल्याची बाब स्पष्ट होत आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही