शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांवर कॉक्झॅकीचा हल्ला

By admin | Updated: September 8, 2015 04:08 IST

पावसातील अनियमिततेमुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक

वर्धा : पावसातील अनियमिततेमुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक असल्याने विषाणूजन्य आजारांचा प्रकोप जाणवत आहे. सध्यास कॉक्झॅकी या विषाणूचा बालकांना विळखा पडला आहे. हात, पाय आणि तोंडावर लालसर अथवा पांढऱ्या रंगाचे पुरळ उठतात. हा संसर्गजन्य आजार असल्याने याचा प्रसार झपाट्याने होत असल्याचा बाब शहरातील बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजाराची लक्षणे असलेली रुग्णसंख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.कॉक्झॅकी हा विषाणू शरीराच्या हात, पाय, तोंड या अवयवांवर प्रभाव दाखवितो. यातही बालकांना याची लागण अधिक होते. आजाराची लागण होण्यापूर्वी ताप येतो. यानंतर अंगावर पुरळ येतात. पुरळ फुटल्यास त्यातून पाणी बाहेर पडते. कधीकधी यात पस होण्याचा धोका असतो. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.शहरातील विविध खासगी रुग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात या आजाराची लागण झालेली अनेक रुग्ण आढळले आहे. शिवाय गत आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आजारामुळे गंभीर परिणाम होत नसले तरी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरते.(स्थानिक प्रतिनिधी)सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे४संसर्ग झालेल व्यक्तीने सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे, असे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे.४या विषाणूचा प्रभाव शाळकरी गटातील मुलांवर अधिक जाणवतो. याच वयोगटातील रुग्णसंख्या अधिक आहे. अंगावर पुुरळ अथवा लालसर चट्टे आढळल्यास पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये.४हा आजार संसर्गजन्य असल्याने आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येवून इतरांनाही त्या झपाट्याने लागत होते. त्यामुळे अशा व्यक्तीने खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.वातावरणात दमटपणा आणि काही प्रमाणात तापमान हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक असते. त्यामुळे विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. या काळात लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी. कारण डेंग्यू, मलेरिया, हिवताप याचाही प्रकोप याकाळात जाणवतो. यापासून बचाव करणे हितावह ठरते.- डॉ. सचिन पावडे, बालरोगतज्ज्ञ, वर्धाआजाराची लक्षणे४मुलांच्या अंगावर पांढरे अथवा लालसर पुरळ आढळल्यास त्वरित रुग्णालयातून उपचार करून घ्यावे.४या विषाणूची लागण होण्यापूर्वी मुलांना ताप येतो. तोंडाला व जीभेला फोड आल्याने जेवण करण्यास त्रास होतो. त्यामुळे मुलांचे जेवण कमी होते. चिडचिडपणा वाढतो. या आजाराचा प्रभाव पाच ते सहा दिवसांपर्यंत असतो. आजाराचे स्वरूप तितकेसे गंभीर नाही. तज्ज्ञांकडून उपचार करून घेतल्यास पुरळ कमी होतात. ताप चार ते पाच दिवसांपर्यंत राहू शकतो.