शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बालकांवर कॉक्झॅकीचा हल्ला

By admin | Updated: September 8, 2015 04:08 IST

पावसातील अनियमिततेमुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक

वर्धा : पावसातील अनियमिततेमुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक असल्याने विषाणूजन्य आजारांचा प्रकोप जाणवत आहे. सध्यास कॉक्झॅकी या विषाणूचा बालकांना विळखा पडला आहे. हात, पाय आणि तोंडावर लालसर अथवा पांढऱ्या रंगाचे पुरळ उठतात. हा संसर्गजन्य आजार असल्याने याचा प्रसार झपाट्याने होत असल्याचा बाब शहरातील बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजाराची लक्षणे असलेली रुग्णसंख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.कॉक्झॅकी हा विषाणू शरीराच्या हात, पाय, तोंड या अवयवांवर प्रभाव दाखवितो. यातही बालकांना याची लागण अधिक होते. आजाराची लागण होण्यापूर्वी ताप येतो. यानंतर अंगावर पुरळ येतात. पुरळ फुटल्यास त्यातून पाणी बाहेर पडते. कधीकधी यात पस होण्याचा धोका असतो. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.शहरातील विविध खासगी रुग्णालयाच्या बाह्य रूग्ण विभागात या आजाराची लागण झालेली अनेक रुग्ण आढळले आहे. शिवाय गत आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आजारामुळे गंभीर परिणाम होत नसले तरी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरते.(स्थानिक प्रतिनिधी)सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे४संसर्ग झालेल व्यक्तीने सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे, असे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे.४या विषाणूचा प्रभाव शाळकरी गटातील मुलांवर अधिक जाणवतो. याच वयोगटातील रुग्णसंख्या अधिक आहे. अंगावर पुुरळ अथवा लालसर चट्टे आढळल्यास पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये.४हा आजार संसर्गजन्य असल्याने आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येवून इतरांनाही त्या झपाट्याने लागत होते. त्यामुळे अशा व्यक्तीने खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.वातावरणात दमटपणा आणि काही प्रमाणात तापमान हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक असते. त्यामुळे विषाणूजन्य आजार डोकेवर काढतात. या काळात लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी. कारण डेंग्यू, मलेरिया, हिवताप याचाही प्रकोप याकाळात जाणवतो. यापासून बचाव करणे हितावह ठरते.- डॉ. सचिन पावडे, बालरोगतज्ज्ञ, वर्धाआजाराची लक्षणे४मुलांच्या अंगावर पांढरे अथवा लालसर पुरळ आढळल्यास त्वरित रुग्णालयातून उपचार करून घ्यावे.४या विषाणूची लागण होण्यापूर्वी मुलांना ताप येतो. तोंडाला व जीभेला फोड आल्याने जेवण करण्यास त्रास होतो. त्यामुळे मुलांचे जेवण कमी होते. चिडचिडपणा वाढतो. या आजाराचा प्रभाव पाच ते सहा दिवसांपर्यंत असतो. आजाराचे स्वरूप तितकेसे गंभीर नाही. तज्ज्ञांकडून उपचार करून घेतल्यास पुरळ कमी होतात. ताप चार ते पाच दिवसांपर्यंत राहू शकतो.