शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जात ही भारतातील सर्वात घातक अंधश्रद्धा

By admin | Updated: January 3, 2015 01:44 IST

आत्मा, पुण्य, पुनर्जन्म या आधारावर आपल्या देशात जात दीर्घकाळापासून टिकली आहे. विशिष्ट जातीचे लोक बुद्धिमान आणि दुसऱ्या जातीचे लोक कमीबुद्धीचे समजले जातात.

आर्वी : आत्मा, पुण्य, पुनर्जन्म या आधारावर आपल्या देशात जात दीर्घकाळापासून टिकली आहे. विशिष्ट जातीचे लोक बुद्धिमान आणि दुसऱ्या जातीचे लोक कमीबुद्धीचे समजले जातात. याला कुठलाही वैज्ञानिक किंवा तात्विक आधार नाही. देशाच्या अखंडतेला जातीमुळे धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जात ही सर्वात घातक अंधश्रद्धा आहे, असे प्रतिपादन अ. भा. अनिसचे जिल्हा संघटक पंकज वंजारे यांनी केले.येथील कृषक शिक्षण संस्थाद्वारे आयोजित कार्यशाळेत ते वैज्ञानिक दृष्टिकोण आणि जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हरिभाऊ विरूळकर तर अतिथी म्हणून अ.भा. अनिसचे कार्यकर्ते दशरथ जाधव, प्रा. सुधाकर भुयार, प्रा. दीपक चव्हाण, प्रा. श्यामप्रकाश पांडे, प्रा. दशरथ नांदुरकर आदी उपस्थित होते.जादुटोणा विरोधी कायद्याची माहिती देताना वंजारे म्हणाले, जगात कुणीही चमत्कार करू शकत नाही. संतांनी सुद्धा चमत्काराला विरोध केला आहे. चमत्कार करून दाखवणाऱ्याला अ. भा. अनिसच्या वतीने २१ लाख रूपयाचे बक्षीस देण्याचे आवाहन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जादुटोणा विरोधी कायद्याच्या १२ कलमांची उकल आपल्या विशेष शैलीत त्यांनी करून दिली. स्वत:च्या आर्थिक प्राप्तीकरिता लोकांना फसविणाऱ्यास, ठगविणाऱ्या भोंदुबाबा, तांत्रिक, मांत्रिक यांच्या विरूद्ध या कायद्याच्या कसा उपयोग करून घेता येईल याची माहिती त्यांनी दिली. दशरथ जाधव यांनी आर्वी परिसरात घडलेल्या भानामती, अंगात भूत येणे आदी घटनांची माहिती दिली. समाजाला जागृत करण्याकरिता विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. विरूळकर यांनी शासनाने पारित केलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अत्यंत प्रभावी असून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन केले.प्रा. सुधाकर भुयार यांनी प्रस्ताविक केले. संचालन दर्शनकुमार चांभारे तर आभार विशाल येलेकर यांनी मानले. प्रा. संजय धनविजय, प्रा. डॉ. विजया मुळे, प्रा. अंजली देशमुख, प्रा. अरूणा रोडे, प्रा. मनोहर सूरज बारापात्रे, गोपाल कळंबे, आकाश बोरवार, श्रृतिका टाकोणे, माधुरी मोकडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)