शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनेही पक्ष्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: March 3, 2016 02:09 IST

नागपूर-वर्धा राज्यमार्गावर या काही वर्षांत जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. विशेष म्हणजे, ही वाहने भरधाव असतात.

अन्नाच्या शोधात महामार्गावर भरधाव वाहनांखाली चिरडले जातात पक्षीवर्धा : नागपूर-वर्धा राज्यमार्गावर या काही वर्षांत जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. विशेष म्हणजे, ही वाहने भरधाव असतात. अन्नाच्या शोधात भिरभिरणारे पक्षी या वाहनांना धडकून आपला जीव गमवित आहेत. यामुळे रस्त्यावर चिरडून गेलेल्या पक्ष्यांचे अवशेष पाहावयास मिळणे, आता नित्याचेच झाले आहे. नागपूर राज्यमार्गावर वर्धा - पवनार या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. सोबतच या रस्त्याच्या दुतर्फा मोठ-मोठी कडुलिंबाची झाडे आहेत. त्यातच सध्या या शेतशिवारांमध्ये गहू, चना, ज्वारी आदी पिके उभी आहेत. अनेकांच्या शेतात तुरीही वाळत आहेत. त्यामुळे या शिवारांत अनेक पक्ष्यांचा अधिवास आहे. पक्षी अन्नाच्या शोधात सर्वात्र भिरभिर फिरत असतात. मोठी झाडे असल्याने या झाडावरच पक्ष्यांचा विसावा असतो; पण या मार्गावर जड वाहने भरधाव असतात. वाहनांच्या गतीमुळे हवेचे झोत पक्ष्यांच्या अंगावर येतात. यामुळे तोल सुटून अनेक पक्षी वाहनांना धडकतात. कधी-कधी त्यांच्या चाकाखाली चिरडले जातात. हा प्रकार येथे नित्याचाच झाला आहे. परिणामी, पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवासच धोक्यात आल्याचे चित्र आहे. यातील काही वाहने ही खूप उंच साहित्य घेऊन जात असतात. हे साहित्य झाडांच्या फांद्यांना अडत असते. त्यामुळे फांद्या तुटूनही पक्ष्यांना इजा होते. त्यामुळे या मार्गावर धावत असलेल्या वाहनांच्या गतीला आवर घालणे गरजेचे झाले आहे. शहरासह गावांमध्ये मोबाईलचे प्रचलन वाढले आहे. यामुळे ठिकठिकाणी टॉवर्स उभारले जात आहेत. यातून निघत असलेल्या चुंबकीय लहरींमुळे पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात पक्ष्यांचे प्रमाण नगन्य झाले आहे. लहान-मोठे पक्षी शेतशिवारांचा आधार घेत आहेत. येथे अन्न-पाण्याची सोय असल्याने पक्ष्यांसाठी हा अधिवास सोयीचाही आहे; पण भरधाव वाहने आता त्यांच्या मृत्यूस कारण ठरत आहेत. यामुळे पक्ष्यांची संख्या आणखीच कमी होत आहे. याकडे सर्वांनीच लक्ष्य देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)रस्त्यावरील अन्न खाताना जातो जीवमहामार्गावर धावत असलेल्या वाहनांमधून अनेक प्रकारच्या खाद्यान्नाची वाहतूकही होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने खड्ड्यांतून वाहने गेल्यावर गहू, डाळ आधी धान्य असल्यास ते मार्गावर सांडते. हे धान्य खाण्यासाठी पक्षी गर्दी करीत असतात. ये-जा करीत असलेली भरधाव वाहने चुकवून पक्षी दाणे टिपत असतात. वाहने चुकविण्याच्या नादात एखाद्या पक्ष्याला शेवटी आपल्या प्राणास मुकावे लागते. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यामुळे भरधाव वाहने पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे पक्षीप्रेमी सांगत आहेत.