शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा-दाभा रस्त्याची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:01 IST

शहरातून दाभा गावाकडे जाणारा दीड किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहने तर सोडा, पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर असणारा रपटाही खचला आहे.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून दुरूस्तीची प्रतीक्षा : मार्गातील दोन पुलांचीही दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : शहरातून दाभा गावाकडे जाणारा दीड किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहने तर सोडा, पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर असणारा रपटाही खचला आहे. यामुळे वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील वाहनांची वाहतूक लक्षात घेता रस्त्याची तथा पुलाची तवरित दुरूस्ती करून तो उंच करणे गरजेचे झाले आहे.कारंजा येथून व्हाया दाभा, उमरी व गवंडीला जाणारा सुमारे ४ किमी लांबीचा रस्ता जि.प. बांधकाम विभागातर्फे १० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. निकृष्ट दर्जाचे बांधकाम तथा वाहनांच्या वर्दळीमुळे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. कारंजा ते दाभा हा दीड किमीचा रस्ता तर खड्डेमय झाला आहे. या रस्त्याने गवंडी, धावसा, सावल, उमरी, लिंगामांडवी आदी गावांतील नागरिकांना कारंजा येथे ये-जा करावी लागते. दुचाकी, अ‍ॅटो, चारचाकी वाहने तसेच बसची वाहतूक सतत सुरू असते. यापूर्वी दोन वेळा या रस्त्याची थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली; पण टाकलेला मुरूम व गिट्टी एकाच पावसात वाहून गेली. या रस्त्याचे डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरूस्ती व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहे. या रस्त्यावर दाभा गावाजवळ नदीवर एक ठेंगणा रपटा बांधला होता. त्या रपट्यावर खड्डे पडले असून कडेला संरक्षक भिंत वा कठडे बांधण्यात आले नाहीत. त्याचप्रमाणे उमरी गावाला जातानाही एका नदीवरील रपटा, कमी उंचीचा असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहते. परिणामी, वाहतूक बंद होते. या रपट्यावर मध्यभागी एक मोठे छिद्र पडल्याने तो अपघातास कारणीभूत ठरत आहे. यामुळे रस्त्याच्या दुरूस्तीसह उंच पुलाची निर्मिती करणे गरजेचे झाले आहे.उमरी या गावातील मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे गावात भाविकांची वर्दळ वाढली आहे. बांधकाम विभागाने कारंजा ते दाभा ते उमरी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावपे. या रस्त्यावरील दोन्ही रपटे दुरूस्त करून उंच करावेत व रपट्याच्या संरक्षणार्थ संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी, दाभा तसेच उमरी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.तीर्थस्थळाला जाणाºया रस्त्यावरही अवकळातालुक्यातील उमरी या गावातील मंदिराला तीर्थस्थळाचा क दर्जा प्राप्त झाला आहे. परिणामी, गावात भेट देणाºया भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या भाविकांना उमरी येथे येताना खाचखळग्यांतून वाट काढावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघाताचा धोका असतो. शिवाय क्षतिग्रस्त रपट्यांमुळेही अपघाताला निमंत्रण मिळते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रस्ता तथा पुलाची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.आर्वी तालुक्यातील रस्त्यांवरही अवकळाकारंजासह आर्वी तालुक्यातील रस्त्यांवरही अवकळाच आली आहे. आर्वी ते टाकरखेड रस्ता खड्ड्यांमध्येच रूतल्याची स्थिती आहे. या रस्त्याची अनेकदा दुरूस्ती करण्यात येते; पण सूमार दर्जाच्या कामामुळे अल्पावधीच रस्त्याची दुरवस्था होते. सध्या पावसामुळे टाकरखेड रस्त्याची चाळणीच झाली आहे. आर्वी-पुलगाव मार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याकडे लक्ष देत संबंधित कंत्राटदारांवरच कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.