शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

अर्ज भरण्यासाठी गादी घेऊनच पोहोचले उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:41 IST

ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन सेंटरवर ठोकला मुक्काम : नाहक त्रासाला जावे लागते सामोरे

देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे आपला अर्ज कालावधीच्या आत भरता यावा म्हणून काही उमेदवारांनी गादी घेऊनच आॅनलाईन सेंटर गाठले. शिवाय मुक्कामही ठोकला.देवळी तालुक्यातील ६३ ग्रा.पं.पैकी ४६ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक तर एका ग्रा.पं.ची पोट निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ५ मार्च ते ९ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. उमेदवारीसाठी आॅनलाईन अर्ज भरावयाचा असल्याने इंटरनेट सेंटरवर गर्दी वाढली आहे. दुपारच्या सुमारास लिंक राहत नाही किंवा नेटची स्पीड कमी राहत असून रात्रीच स्पीड जास्त राहते, असा समज असल्यामुळे दिवस-रात्र इंटरनेट केंद्र सुरु असल्याचे दिसून येते. एका उमेदवाराला अर्ज भरताना जवळपास १९ मुद्द्यांची पुर्तता करावी लागत आहे. त्यातही इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे अर्ज भरण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवार आता गादी घेऊन इंटरनेट सेंटरवर पोहोचत आहेत. रात्रभरही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहत असल्याने उमेदवार तेथेच झोपी जातात. ठरलेल्या यादीनुसार क्रमांक आला की त्यांना झोपेतून जागे करीत त्यांचा अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु केली जात आहे. सध्या इंटरनेट सेंटरवर दिवसरात्र एक करुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याने रात्रीही दिवसाचाच अनुभव येत आहे. मात्र, शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस असल्याने या किचकट प्रणालीत कितींचे अर्ज दाखल होतात व किंतींच्या अपेक्षेवर पाणी फेरतात, याकडेही स्थानिक राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.ग्रामपंचायतीला सुगीचे दिवसग्रामपंचायतींना एरवी कर वसुलीकरिता विविध उपाययोजना कराव्या लागतात. उमेदवारी अर्ज भरण्याकरिता उमेदवाराकडे ग्रामपंचायतचा कर थकीत नसावा, अशी अट असल्याने आता ईच्छुकांकडून कर भरल्या जात आहे. तसेच इतरही प्रमाणपत्राकरिता शुल्क वसुल केल्या जात असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक