शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

अर्ज भरण्यासाठी गादी घेऊनच पोहोचले उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:41 IST

ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन सेंटरवर ठोकला मुक्काम : नाहक त्रासाला जावे लागते सामोरे

देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे आपला अर्ज कालावधीच्या आत भरता यावा म्हणून काही उमेदवारांनी गादी घेऊनच आॅनलाईन सेंटर गाठले. शिवाय मुक्कामही ठोकला.देवळी तालुक्यातील ६३ ग्रा.पं.पैकी ४६ ग्रा.पं. च्या सार्वत्रिक तर एका ग्रा.पं.ची पोट निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ५ मार्च ते ९ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. उमेदवारीसाठी आॅनलाईन अर्ज भरावयाचा असल्याने इंटरनेट सेंटरवर गर्दी वाढली आहे. दुपारच्या सुमारास लिंक राहत नाही किंवा नेटची स्पीड कमी राहत असून रात्रीच स्पीड जास्त राहते, असा समज असल्यामुळे दिवस-रात्र इंटरनेट केंद्र सुरु असल्याचे दिसून येते. एका उमेदवाराला अर्ज भरताना जवळपास १९ मुद्द्यांची पुर्तता करावी लागत आहे. त्यातही इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे अर्ज भरण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे उमेदवार आता गादी घेऊन इंटरनेट सेंटरवर पोहोचत आहेत. रात्रभरही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहत असल्याने उमेदवार तेथेच झोपी जातात. ठरलेल्या यादीनुसार क्रमांक आला की त्यांना झोपेतून जागे करीत त्यांचा अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु केली जात आहे. सध्या इंटरनेट सेंटरवर दिवसरात्र एक करुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याने रात्रीही दिवसाचाच अनुभव येत आहे. मात्र, शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतीम दिवस असल्याने या किचकट प्रणालीत कितींचे अर्ज दाखल होतात व किंतींच्या अपेक्षेवर पाणी फेरतात, याकडेही स्थानिक राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.ग्रामपंचायतीला सुगीचे दिवसग्रामपंचायतींना एरवी कर वसुलीकरिता विविध उपाययोजना कराव्या लागतात. उमेदवारी अर्ज भरण्याकरिता उमेदवाराकडे ग्रामपंचायतचा कर थकीत नसावा, अशी अट असल्याने आता ईच्छुकांकडून कर भरल्या जात आहे. तसेच इतरही प्रमाणपत्राकरिता शुल्क वसुल केल्या जात असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक