शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

सभांतील टोलेबाजीसाठी मतदारांसह उमेदवारही आतूर

By admin | Updated: October 9, 2014 23:07 IST

निवडणूक प्रचार बंद होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना सहा पैकी दोन पक्षाच्या पुढाऱ्यांनी या मतदार संघात हजेरी लावून जाहीर सभा घेतल्या़ उर्वरित उमेदवारांच्या सभा झाल्या नसल्या तरी प्रचाराची

भास्कर कलोडे - हिंगणघाटनिवडणूक प्रचार बंद होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना सहा पैकी दोन पक्षाच्या पुढाऱ्यांनी या मतदार संघात हजेरी लावून जाहीर सभा घेतल्या़ उर्वरित उमेदवारांच्या सभा झाल्या नसल्या तरी प्रचाराची रणधुमाळी माजविली जात आहे़यंदा विधानसभा निवडणुकीत १५ वर्षांची काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी फुटली तर शिवसेना-भाजपाची २५ वर्षांची युती ऐन नामांकन भरण्याच्या दिवसांत तुटल्याने या चारही राजकीय पक्षाचे उमेदावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी बसपा व मनसेच्या उमेदवारांची उमेदवारीसुद्धा दखलपात्र आहे अन्य आठ उमेदवारांची उमेदवारीही काहींना फटका देणारी आहे. आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांत युती-आघाडीच्या मोठ-मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा गाजविल्याचे साक्षीदार टाका ग्राऊंड व गोकुलधाम मैदान आहे; पण या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, बसपा व मनसे यापैकी केवळ राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रीया सुळे व आर.आर. पाटील यांनी येथे जाहीर सभा घेऊन टोलेबाजी केली. त्यांचे हेलीकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दीही केली तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टाका ग्राऊंडवर चिडचिडत्या उन्हात भरदुपारी सौम्य टोलेबाजीने मतदारांचे मनोरंजन झाले. पण भाजप, शिवसेना, काँग्रेस व बसपाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची जाहीर सभा या मतदार संघात अद्याप झालेली नाही.जाहीर सभांमधून होणाऱ्या आरोप -प्रत्यारोपाची टोलेबाजी व चिमटे काढण्याचे प्रकार ऐकण्यासाठी मतदार आतूर असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारसुद्धा नेत्यांच्या जाहीर सभांची आतुरतेने वाट पाहत आहे; पण यंदा राज्यातील सर्वच मतदार प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहे. यामुळे सभा गाजविणाऱ्या नेत्यांची कमतरता निर्माण झाली़ परिणामी, काही मोजक्या मतदार संघात दिग्गजांच्या सभा होताना दिसतात़ भाजपात केंद्रीय स्टार प्रचाराकांची काही प्रमाणात उपलब्धी असली तरी राज्यात मात्र प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची उणीव जाणवत आहे; पण काँग्रेसमध्ये सभा गाजविणाऱ्या वक्त्यांची कमतरता असल्याचे काँग्रेस खासगीत बोलत आहे. शिवसेना, बसपात वक्ते असले तरी अद्याप येथे पोहोचले नाही़ यामुळे उमेदवार अस्वस्थ असून नेत्यांच्या सभांसाठी प्रयत्नशील आहे. आपल्या भाषणातून राजकारणाची दिशा व उमेदवाराची दशा बदलणारे हुकमी नेते बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, विलास देशमुख, गोपीनाथ मुंडे आज हयात नाही. त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव यंदाच्या निवडणुकीत उमेदवार व मतदारांना प्रकर्षाने होताना दिसते़