शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सभांतील टोलेबाजीसाठी मतदारांसह उमेदवारही आतूर

By admin | Updated: October 9, 2014 23:07 IST

निवडणूक प्रचार बंद होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना सहा पैकी दोन पक्षाच्या पुढाऱ्यांनी या मतदार संघात हजेरी लावून जाहीर सभा घेतल्या़ उर्वरित उमेदवारांच्या सभा झाल्या नसल्या तरी प्रचाराची

भास्कर कलोडे - हिंगणघाटनिवडणूक प्रचार बंद होण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना सहा पैकी दोन पक्षाच्या पुढाऱ्यांनी या मतदार संघात हजेरी लावून जाहीर सभा घेतल्या़ उर्वरित उमेदवारांच्या सभा झाल्या नसल्या तरी प्रचाराची रणधुमाळी माजविली जात आहे़यंदा विधानसभा निवडणुकीत १५ वर्षांची काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी फुटली तर शिवसेना-भाजपाची २५ वर्षांची युती ऐन नामांकन भरण्याच्या दिवसांत तुटल्याने या चारही राजकीय पक्षाचे उमेदावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी बसपा व मनसेच्या उमेदवारांची उमेदवारीसुद्धा दखलपात्र आहे अन्य आठ उमेदवारांची उमेदवारीही काहींना फटका देणारी आहे. आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांत युती-आघाडीच्या मोठ-मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा गाजविल्याचे साक्षीदार टाका ग्राऊंड व गोकुलधाम मैदान आहे; पण या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, बसपा व मनसे यापैकी केवळ राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रीया सुळे व आर.आर. पाटील यांनी येथे जाहीर सभा घेऊन टोलेबाजी केली. त्यांचे हेलीकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दीही केली तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टाका ग्राऊंडवर चिडचिडत्या उन्हात भरदुपारी सौम्य टोलेबाजीने मतदारांचे मनोरंजन झाले. पण भाजप, शिवसेना, काँग्रेस व बसपाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याची जाहीर सभा या मतदार संघात अद्याप झालेली नाही.जाहीर सभांमधून होणाऱ्या आरोप -प्रत्यारोपाची टोलेबाजी व चिमटे काढण्याचे प्रकार ऐकण्यासाठी मतदार आतूर असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारसुद्धा नेत्यांच्या जाहीर सभांची आतुरतेने वाट पाहत आहे; पण यंदा राज्यातील सर्वच मतदार प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले आहे. यामुळे सभा गाजविणाऱ्या नेत्यांची कमतरता निर्माण झाली़ परिणामी, काही मोजक्या मतदार संघात दिग्गजांच्या सभा होताना दिसतात़ भाजपात केंद्रीय स्टार प्रचाराकांची काही प्रमाणात उपलब्धी असली तरी राज्यात मात्र प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची उणीव जाणवत आहे; पण काँग्रेसमध्ये सभा गाजविणाऱ्या वक्त्यांची कमतरता असल्याचे काँग्रेस खासगीत बोलत आहे. शिवसेना, बसपात वक्ते असले तरी अद्याप येथे पोहोचले नाही़ यामुळे उमेदवार अस्वस्थ असून नेत्यांच्या सभांसाठी प्रयत्नशील आहे. आपल्या भाषणातून राजकारणाची दिशा व उमेदवाराची दशा बदलणारे हुकमी नेते बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, विलास देशमुख, गोपीनाथ मुंडे आज हयात नाही. त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव यंदाच्या निवडणुकीत उमेदवार व मतदारांना प्रकर्षाने होताना दिसते़