शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

एमपीएससी परीक्षा देण्याऱ्या उमेदवाराला आता सहा-नऊ संधीचे बंधन; विद्यार्थ्यांमधून व्यक्त होतेय तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या  जाईल.

ठळक मुद्देकुणी केले स्वागत, तर कुणी आळविला नाराजीचा सूर : शासन निर्णय अन्यायकारकच

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारासाठी संधीची कमाल मर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्यावर आता सहा-नऊच्या  संधीचे बंधन आल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या  जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. अशा बंधनांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले  आहे.

कमाल संधीची मर्यादा निश्चित करण्याबाबतची घोषणा स्वागतार्ह असून हा निर्णय घेण्याची वेळ चुकलेली आहे. ज्याप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी ही  मर्यादा केवळ यूपीएससीपर्र्यंत मर्यादित ठेवते. त्याच सिव्हील सर्व्हिस एक्झामिनेशनप्रमाणे एमपीएससी पण ठेवणार का की एमपीएसीच्या पूर्ण परीक्षेवर निर्बंध घातले जातील? संभ्रम निर्माण झाला आहे.- सागर ढाकुलकर, विद्यार्थी, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय,.

दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षेचे टप्प्यांची अडचण आणि  कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास, उमेदवारी रद्द झाल्यास ती संख्या मोजली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, हे निश्चितच. म्हणून संधीचे बंधन नसावे, अशी आग्रही मागणी आहे.- अक्षय नारायणराव घोडे, आसोलेनगर, आर्वी.

अशाप्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कमाल संधीची मर्यादा हा निर्णय स्वागतार्ह आहे; पण हा निर्णय केवळ महाराष्ट्र राज्यसेवा या परीक्षेला असला तर उर्वरित परीक्षेला मुलांना प्रयत्न करण्याची  मुभा मिळेल व केंद्रीय लोक सेवा आयोगाप्रमाणे सीएसएटी हा ३३ टक्के पासिंग असला तर हा निर्णय जास्त हितकारक ठरेल, असे माझे मत आहे.-स्मिता बनसोड, एमपीएससीची तयारी करणारी विद्यार्थिनी. सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय, आर्वी.

स्पर्धा परीक्षेबाबत सर्वांना समान निर्णय असावा.  या घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही.यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होण्याची शक्यता आहे.- संजीवनी ब्राह्मणे, महात्मा फुले अभ्यासिका.

सरकारने स्पर्धा परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. या निर्णयाने आपापसात मतभेद दिसून येतात. या अध्यादेशाचा मी निषेध करतो. - धम्मपाल इंगोले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग