शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एमपीएससी परीक्षा देण्याऱ्या उमेदवाराला आता सहा-नऊ संधीचे बंधन; विद्यार्थ्यांमधून व्यक्त होतेय तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या  जाईल.

ठळक मुद्देकुणी केले स्वागत, तर कुणी आळविला नाराजीचा सूर : शासन निर्णय अन्यायकारकच

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारासाठी संधीची कमाल मर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्यावर आता सहा-नऊच्या  संधीचे बंधन आल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या  जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. अशा बंधनांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले  आहे.

कमाल संधीची मर्यादा निश्चित करण्याबाबतची घोषणा स्वागतार्ह असून हा निर्णय घेण्याची वेळ चुकलेली आहे. ज्याप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी ही  मर्यादा केवळ यूपीएससीपर्र्यंत मर्यादित ठेवते. त्याच सिव्हील सर्व्हिस एक्झामिनेशनप्रमाणे एमपीएससी पण ठेवणार का की एमपीएसीच्या पूर्ण परीक्षेवर निर्बंध घातले जातील? संभ्रम निर्माण झाला आहे.- सागर ढाकुलकर, विद्यार्थी, सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय,.

दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षेचे टप्प्यांची अडचण आणि  कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास, उमेदवारी रद्द झाल्यास ती संख्या मोजली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, हे निश्चितच. म्हणून संधीचे बंधन नसावे, अशी आग्रही मागणी आहे.- अक्षय नारायणराव घोडे, आसोलेनगर, आर्वी.

अशाप्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कमाल संधीची मर्यादा हा निर्णय स्वागतार्ह आहे; पण हा निर्णय केवळ महाराष्ट्र राज्यसेवा या परीक्षेला असला तर उर्वरित परीक्षेला मुलांना प्रयत्न करण्याची  मुभा मिळेल व केंद्रीय लोक सेवा आयोगाप्रमाणे सीएसएटी हा ३३ टक्के पासिंग असला तर हा निर्णय जास्त हितकारक ठरेल, असे माझे मत आहे.-स्मिता बनसोड, एमपीएससीची तयारी करणारी विद्यार्थिनी. सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय, आर्वी.

स्पर्धा परीक्षेबाबत सर्वांना समान निर्णय असावा.  या घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही.यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होण्याची शक्यता आहे.- संजीवनी ब्राह्मणे, महात्मा फुले अभ्यासिका.

सरकारने स्पर्धा परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. या निर्णयाने आपापसात मतभेद दिसून येतात. या अध्यादेशाचा मी निषेध करतो. - धम्मपाल इंगोले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग