शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

कालवे, पाटचऱ्या सोडून पाणी वाहते शेतात

By admin | Updated: January 28, 2016 02:13 IST

परिसरातील खरांगणा (गोडे) हमदापूर, पुढे वायगाव, भोसा आदी गावापर्यंत महाकाली आणि बोर धरणाचे पाणी कालवे, ...

सेवाग्राम : परिसरातील खरांगणा (गोडे) हमदापूर, पुढे वायगाव, भोसा आदी गावापर्यंत महाकाली आणि बोर धरणाचे पाणी कालवे, उपकालवे आणि पाटचऱ्यांच्या माध्यमातून शेतात पोहचले आहे. परंतु सदर पाणी कालवे सोडून वाट मिळेल तिकडे वाहता आसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. महाकाळी आणि बोर प्रकल्पामुळे सेवाग्राम ते हमदापूर पुढे वायगाव, भोसा आदी गावात सिंचनाला बळकटी मिळाली आहे. शेतकऱ्यांना बारमाही पिके घेणे सोपे झाले आहे. परंतु कुटकी फाटा ते हमदापूर या दरम्यान शिवनगर आणि हमदापूर परिसरात पाणी कालवे व पाटसऱ्यां सोदून शेतात व रस्त्यावर वाहात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून पिकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे कालवे, उपकालवे आणि पाटचऱ्यांची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. पाटबंधारे विभागाने याची दखल घेत वाया जाणारे पाणी व त्यातून होत असलेले पिकांचे नुकसान थांबविण्याची मागणी या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वारंवार करीत आहेत.(वार्ताहर)