शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

कालव्याचे पाणी सोडले शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:57 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाचा प्रताप : पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून निर्माण केलेला निम्न वर्धा प्रकल्प सध्या डोकेदुखी ठरू लागला आहे. कालव्याच्या सदोष कामांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने असंतोष पसरला आहे. देवळी तालुक्यातील मौजा रायपूर येथे असाच प्रकार झाल्याने शेतातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे.निम्न वर्धा प्रकल्पाचा डावा कालवा देवळी तालुक्यातून गेला आहे. सदर कालवा मौजा रायपूर येथील सर्व्हे क्र. ९९.१०० या शेताजवळ बंद करण्यात आला आहे. कालव्याचे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी शेताच्या जवळ नाली करण्यात आली आहे. भविष्यात या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अतिरिक्त पाणी सदर नालीतून वाहून जाताना शेतात शिरण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. रायपूर येथील दत्तात्रय मसणे यांच्या शेताच्या धुऱ्यावरच कालव्याचे पाणी वाहून जाण्याकरिता नाली करण्यात आली आहे. नालीलगत रस्त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर कालवा शेताजवळ बंद झालेला आहे. यामुळे कालव्यातील अतिरिक्त पाणी शेताच्या बाजूने नालीद्वारे वाहून जाणार आहे. परिणामी, मसणे यांच्या शेतातील पिकांनाच धोका निर्माण झाला आहे. सर्व्हे क्र. ९८ हे बाबाराव मसणे यांचे शेत असून या पाण्यामुळे त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील पिकेही धोक्यात आली आहेत.कालव्याची कामे करताना शेतकऱ्यांशी चर्चा केली जात नाही. त्यांची कुठलीही परवानगी घेतली जात नाही वा त्यांना सूचनाही दिली जात नाही. परिणामी, सिंचनाची सुविधा मिळावी म्हणून केलेली कामे शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. तत्पूर्वी शेतकरी मसणे यांनी अनेकदा तक्रारी केल्या. त्यावर तलाठ्याकडून अहवालही मागविण्यात आला; पण अद्याप कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. यामुळे कालव्याला पाणी सोडल्यानंतर तथा पावसाळ्यात मसणे यांना शेती करणेच जिकरीचे ठरणार आहे. यामुळे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.अनेक ठिकाणी कामे अपूर्णचगत कित्येक वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू आहे; पण अद्यापही डावा कालवा पूर्णत्वास गेलेला नाही. पुलगाव शहरात अद्याप खोदकामही पूर्ण करण्यात आलेले नाही. असे असले तरी कालव्याला पाणी सोडले जाते. परिणामी, शहरात तथा परिसरातील गावांत अनेक घटना घडल्या आहेत. देवळी तालुक्यात बहुतांश ठिकाणी कालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे; पण पुलगाव शहरातील कालव्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. शिवाय पाटचऱ्यांची कामे अद्याप सुरूही करण्यात आलेली नाहीत. यामुळे बहुतांश शेतांपर्यंत अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अद्याप सिंचनाची सुविधा झालेली नाही. निम्न वर्धा प्रकल्प कालवे विभागाने याकडेही लक्ष देत कालवा तथा पाटचऱ्या पूर्ण करणे गरजेचे आहे.मसणे यांच्या तक्रारीवरून वरिष्ठांनी मोका पाहणी केली. सदर शेताजवळ कालवा बंद केला आहे. शेताच्या शेजारून काढलेली नाली बुजवून पाटचरी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.- आर.आर. बोडेकर, उपअभियंता, निम्न वर्धा प्रकल्प, कालवे विभाग, देवळी.