शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

कालव्याचे पाणी शेतात शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:28 IST

बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचºया व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे उभ्या पिकाचे नुकसान : शासकीय मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचऱ्या व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकºयाच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.मदना येथील शेतकरी शंकर विठ्ठल तामखाने याच्या शेताजवळ जलाशयाचे गेट क्रमांक चार आहे. या गेटमधून शेतकºयांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु, पाटचऱ्यांची वेळीच दुरूस्ती न करण्यात आल्याने सोडण्यात आलेले पाणी थेट तामखाने यांच्या शेतात शिरले. यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. या प्रकारामुळे त्यांच्या शेतातील तीन एकरातील कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय काही झाडांना कापूस लागून असताना कापूस वेचताना चिखल तुडवावा लागत आहे. या प्रकारामुळे शेतकरी शंकर तामखाने यांच्या अडचणीत वाढ झाली असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून तात्काळ शासकीय मदत देण्याची मागणी आहे.पाणी वापर संस्थेचेही दुर्लक्षपाणी वापर संस्थेच्या अध्यक्षांसह संबंधितांना वारंवार परिसरातील शेतकऱ्यांनी धरणातून पाणी सोडण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी असे सांगितले. परंतु, संस्थेच्यावतीने मनात येईल तेव्हा पाणी सोडल्या जाते शिवाय त्यांच्या या मनमर्जी कामाला पाटबंधारे विभागाचे अधिकारी साथ देत असल्याची परिसरात ओरड आहे. शेतकरी हितार्थ निर्णय घेत अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.कालव्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे आपले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आपण अध्यक्षांना माहिती दिली. परंतु, ते आमदार, खासदाराकडे जाण्याचा सल्ला देत आपली जबाबदारी झटकत आहेत. सदर प्रकारामुळे आल्यावर आत्महत्येचीच वेळ आली असून संबंधितांनी तात्काळ योग्य कार्यवाही करावी.- शंकर तामखाने, शेतकरी, मदना.