शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

विदर्भातील केळीचा कॅलिफोर्निया झाला रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:56 IST

जिल्ह्यातील सेलू तालुका हा केळीचा कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात प्रसिद्ध होता. परंतु, आता या भागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे केळीचे बगीच्याची लागवड आता बंद झाली आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी लागवड केली बंद : भावापेक्षा खर्च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सेलू तालुका हा केळीचा कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात प्रसिद्ध होता. परंतु, आता या भागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे केळीचे बगीच्याची लागवड आता बंद झाली आहे. शासनाचे विदर्भातील केळी उत्पादकांच्या अडचणीकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याने केळी उत्पादक आता दुसºया पिकांकडे वळले आहे.विदर्भात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात येत होती. या भागात ओलिताची सोय असल्याने केळी पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत होते. या केळीच्या पिकाला मध्यप्रदेशासह देशाच्या विविध भागात पाठविण्यात येत होते. सेलू येथे मोठे व्यापारी केंद्र केळीच्या बाजारपेठेच्या रूपाने उपलब्ध होत. परिसरातील २० ते २५ गावात केळी पिकाची लागवड शेतकरी करीत होता. मात्र, अलिकडे जंगली श्वापदांचा (रानडुक्कर) याचा त्रास या भागात मोठ्या प्रमाणावर वाढला. तसेच भारनियमनाच्या वेळा बदलल्या. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतामानात केळीचे पीक टिकवून ठेवणे कठीण जावू लागले. केळी पिकाचा खर्च व त्याला मिळणारा भाव याचा समीकरण जुळणे कठीण होवू लागले. केळी पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संचही खरेदी केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या पवनार येथे आल्या असता त्यांना सेलू परिसरातील काही केळी उत्पादकांनी केळीचा एक मोठा घड भेट म्हणून दिला होता; पण भारनियमनामुळे त्या माध्यमातूनही ओलित करणे शक्य होत नसल्याने सध्या सेलू तालुक्यातील केळी उत्पादक शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.पील खरेदीचा खर्च वाढलापूर्वी सेलू तालुक्यात केळीचे ट्रकद्वारे खानदेशातून पील आणण्यात येत होते. ते शेतकऱ्यांना किरकोळ दराने विकल्या जात होते. या माध्यमातून केळीचे उत्पादन शेतकरी घेत होते. परंतु, आता केळी उत्पादन घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जे शेतकरी केळीचे उत्पादन घेतात ते टिश्यू केळीचा वापर पील म्हणून करू लागले आहे. साधारणत: २०० रूपयाला एक याप्रमाणे हे पिल उपलब्ध होतात. यातून अधिक किलो वजानाच्या केळीचे उत्पादन घेतले जाते. आता काही ठराविक गावातच विशिष्ट बगीचे केळीचे उरलेले आहेत.उरल्या केवळ स्मृती१९७५ मध्ये आणीबाणी लावण्यात आली होती. त्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार विराजमान झाले. या सरकारच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पवनार येथे आल्या होत्या. यावेळी सेलू परिसरातील नागरिकांनी इंदिरा गांधींना एक मोठा घड भेट दिला होता. या कार्यक्रमाला काँग्रेसचे तत्कालीन खजीनदार सिताराम केसरीही त्यांच्या सोबत होते.केळीचे पिकाला भरपूर पाण्याची गरज असते. ऐन ओलिताच्यावेळी विहिरीला पाणी असतानाही भारनियमनामुळे ते करणे शक्य होत नाही. उन्हाळ्यात पीक वाचविणेही कठीण होते. त्यातच योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे गत सात वर्षांपासून केळीचे पीक घेणे बंद केले.- श्याम बोबडे, शेतकरी, वडगाव (कला).केळीचे पीक घेताना शेणखताचा व रासायनिक खताचा वापर केल्या जातो;पण त्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. त्यातच भावातील घसरण अडचण वाढविणारी आहे. केळीचे उत्पादन न परवडणारे असून केळीचे पीक घेणे बंद केले. भाजीपालाचे पीक घेत आहो.- अनिल राऊत, शेतकरी, घोराड.वादळ वारा यामुळे गत दोन वर्षांअगोदर मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. यामुळे यातून आर्थिक दृष्ट्या सावरणे कठीण झाले. यातच केळीची लावण, चाळण वाफ ओढणे आदी कामासाठी मजूर मिळेनासे झाले आणि उत्पन्न हातात येईपर्यंत चिंता करावी लागत होती. म्हणून केळी लावणे बंद केले आहे.- अमर धोटे, शेतकरी, किन्हीमोई.