शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

विदर्भातील केळीचा कॅलिफोर्निया झाला रिकामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:56 IST

जिल्ह्यातील सेलू तालुका हा केळीचा कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात प्रसिद्ध होता. परंतु, आता या भागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे केळीचे बगीच्याची लागवड आता बंद झाली आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी लागवड केली बंद : भावापेक्षा खर्च अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सेलू तालुका हा केळीचा कॅलिफोर्निया म्हणून विदर्भात प्रसिद्ध होता. परंतु, आता या भागात अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे केळीचे बगीच्याची लागवड आता बंद झाली आहे. शासनाचे विदर्भातील केळी उत्पादकांच्या अडचणीकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याने केळी उत्पादक आता दुसºया पिकांकडे वळले आहे.विदर्भात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात येत होती. या भागात ओलिताची सोय असल्याने केळी पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत होते. या केळीच्या पिकाला मध्यप्रदेशासह देशाच्या विविध भागात पाठविण्यात येत होते. सेलू येथे मोठे व्यापारी केंद्र केळीच्या बाजारपेठेच्या रूपाने उपलब्ध होत. परिसरातील २० ते २५ गावात केळी पिकाची लागवड शेतकरी करीत होता. मात्र, अलिकडे जंगली श्वापदांचा (रानडुक्कर) याचा त्रास या भागात मोठ्या प्रमाणावर वाढला. तसेच भारनियमनाच्या वेळा बदलल्या. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतामानात केळीचे पीक टिकवून ठेवणे कठीण जावू लागले. केळी पिकाचा खर्च व त्याला मिळणारा भाव याचा समीकरण जुळणे कठीण होवू लागले. केळी पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संचही खरेदी केले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या पवनार येथे आल्या असता त्यांना सेलू परिसरातील काही केळी उत्पादकांनी केळीचा एक मोठा घड भेट म्हणून दिला होता; पण भारनियमनामुळे त्या माध्यमातूनही ओलित करणे शक्य होत नसल्याने सध्या सेलू तालुक्यातील केळी उत्पादक शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे.पील खरेदीचा खर्च वाढलापूर्वी सेलू तालुक्यात केळीचे ट्रकद्वारे खानदेशातून पील आणण्यात येत होते. ते शेतकऱ्यांना किरकोळ दराने विकल्या जात होते. या माध्यमातून केळीचे उत्पादन शेतकरी घेत होते. परंतु, आता केळी उत्पादन घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे जे शेतकरी केळीचे उत्पादन घेतात ते टिश्यू केळीचा वापर पील म्हणून करू लागले आहे. साधारणत: २०० रूपयाला एक याप्रमाणे हे पिल उपलब्ध होतात. यातून अधिक किलो वजानाच्या केळीचे उत्पादन घेतले जाते. आता काही ठराविक गावातच विशिष्ट बगीचे केळीचे उरलेले आहेत.उरल्या केवळ स्मृती१९७५ मध्ये आणीबाणी लावण्यात आली होती. त्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार विराजमान झाले. या सरकारच्या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पवनार येथे आल्या होत्या. यावेळी सेलू परिसरातील नागरिकांनी इंदिरा गांधींना एक मोठा घड भेट दिला होता. या कार्यक्रमाला काँग्रेसचे तत्कालीन खजीनदार सिताराम केसरीही त्यांच्या सोबत होते.केळीचे पिकाला भरपूर पाण्याची गरज असते. ऐन ओलिताच्यावेळी विहिरीला पाणी असतानाही भारनियमनामुळे ते करणे शक्य होत नाही. उन्हाळ्यात पीक वाचविणेही कठीण होते. त्यातच योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे गत सात वर्षांपासून केळीचे पीक घेणे बंद केले.- श्याम बोबडे, शेतकरी, वडगाव (कला).केळीचे पीक घेताना शेणखताचा व रासायनिक खताचा वापर केल्या जातो;पण त्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. त्यातच भावातील घसरण अडचण वाढविणारी आहे. केळीचे उत्पादन न परवडणारे असून केळीचे पीक घेणे बंद केले. भाजीपालाचे पीक घेत आहो.- अनिल राऊत, शेतकरी, घोराड.वादळ वारा यामुळे गत दोन वर्षांअगोदर मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. यामुळे यातून आर्थिक दृष्ट्या सावरणे कठीण झाले. यातच केळीची लावण, चाळण वाफ ओढणे आदी कामासाठी मजूर मिळेनासे झाले आणि उत्पन्न हातात येईपर्यंत चिंता करावी लागत होती. म्हणून केळी लावणे बंद केले आहे.- अमर धोटे, शेतकरी, किन्हीमोई.