शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे बांधकाम रखडल्याने बससेवा झाली बंद

By admin | Updated: November 14, 2016 00:56 IST

विजयगोपाल ते तांभा या मार्गावरील सावंगी (येंडे) येथील पुलाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले.

बांधकाम पूर्ण करण्याची मागणी : विजयगोपाल ते तांभा मार्गावरील प्रवाशांना फटका विजयगोपाल : विजयगोपाल ते तांभा या मार्गावरील सावंगी (येंडे) येथील पुलाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले. या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले; पण दोन वर्षांचा कालावधी लोटूनही पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. यामुळे या मार्गावरील बसफेरी बंद झाली आहे. याचा फटका येथील प्रवाशांना बसत असल्याचे दिसते.निधीच्या अडचणीमध्ये या पुलाचे बांधकाम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. विजयगोपाल ते तांभा, सावंगी (येंडे) रस्त्यावर असलेला गाव नाल्यावरील पूल अतिशय जीर्ण झाला होता. तसेच हा पूल कमी उंचीचा असल्याने अल्पशा पावसानेही पुलावरील वाहतूक बंद होत होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी येथे नवीन पूल देण्याची मागणी तत्कालीन बांधकाम राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्याकडे केली. या मागणीला मंजुरी देत त्यांनी या पुलाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून दिला. यानंतर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. बांधकामालाही प्रारंभ झाला; पण मध्येच हे काम रखडले. पुलाच्या बांधकामाची गती अतिशय मंद असल्याने दोन पावसाळे लोटले तरी काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. या पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे या मार्गावरील बसफेरी वर्षभरापासून बंद आहे. याचा फटका विद्यार्थी आणि ग्रामस्थांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी लोटला तरी याचे काम अपूर्ण आहे. पुलाचे बांधकाम अद्यापपर्यंत अर्धवट का, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे. पुलाचे बांधकाम अर्धवट तर आहेच, शिवाय बांधकाम साहित्य रस्त्यात टाकले जात असल्याने वाहनांना अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. पुलाचे बांधकाम झाले नसल्याने बसफेरी बंद केली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांची पायपीट होते. बांधकाम विभागाकडून या पुलाचे बांधकाम कधी सुरू होईल याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)