शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

पुलाच्या अर्धवट बांधकामाने बससेवा बंद

By admin | Updated: June 30, 2016 02:18 IST

हिंगणी ते बोरधण मार्गावर शिवाजी पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या रपट्यामुळे नाल्यातून रहदारी अडचणीची झाली होती.

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल : बांधकाम विभागाची हलगर्जीसेलू : हिंगणी ते बोरधण मार्गावर शिवाजी पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या रपट्यामुळे नाल्यातून रहदारी अडचणीची झाली होती. यामुळे तेथे उंच पुलाचे बांधकाम सुरू आहे. रहदारीसाठी वळण रस्ता तयार करण्यात आला. त्या वळण रस्त्याचे खडीकरण करण्यात आले नाही. आता पावसामुळे रस्त्यावरून वाहनेच जाणे बंद झाले. परिणामी, बोरधरणला जाणारी बससेवाही हिंगणीपर्यंतच सिमीत करण्यात आली. यात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.बोर व्याघ्र प्रकल्प झाल्यानंतर बोरधरणचे महत्त्व वाढले. पर्यटकांची गर्दीही वाढली; पण या रस्त्यावरील पुलामुळे रहदारीलाच अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते; पण कासवगतीने काम सुरू आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून केलेला वळण रस्ता केवळ माती टाकून करण्यात आला. आता पावसामुळे तो रस्ता चिखलमय झाला आहे. तेथून वाहनचालकांना वाहनेच काढता येत नाहीत. अनेक दुचाकी चालक पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे व वळण रस्ता खडीकरण, मजबुतीकरण करून मार्ग सुरळीत करावा, अशी मागणी राजेंद्र कोकाटे व ग्रामस्थांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)रहदारीही धोक्यातसेलू ते बोरधरण मार्गावर सध्या रहदारी वाढली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. यातच हिंगणी ते बोरधरण दरम्यान पुलाचे बांधकाम करण्यात येत असल्याने आणि वळण रस्त्याचे खडीकरण न केल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असताना बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे ते रखडले. परिणामी, चिखलामुळे अपघात होत आहे. आता बससेवा बंद झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.