शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

ट्रॅव्हल्सची बसला धडक ११ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:25 IST

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देशेडगाव शिवारातील घटना : जखमीत विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, रापमच्या वर्धा आगाराची एम.एच. १४ बी.टी. १२५२ क्रमांकाची बस वर्धेकडून समुद्रपूरच्या दिशेने जात होती. ही बस शेडगाव चौरस्ता परिसरात रस्ता ओलांडत असताना चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या एम. एच. ३४ ए.व्ही. १२७७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने या बसला जबर धडक दिली.या अपघातात समुद्रपूर येथील शाळेत जात असलेल्या अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगता, अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे सर्व रा. मांडगाव तसेच लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार दोन्ही रा. भुगाव आणि नागपूर येथील रामा विनायक बांधेकर हे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत कºहाडे, बंडु डडमल, दिनेश धवने, नागेश तिवारी, किशोर येळणे, देवेंद्र पुरी, चंदु बन्सोड यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतली. शिवाय जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.वाहतूक खोळंबलीभरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अकरा जण जखमी झाले. अपघातानंतर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्याकडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.शेडगाव चौरस्ता धोक्याचाचशेडगाव चौरस्ता परिसरात यापूर्वीही अनेक अनघात झाले असून शेकडो जणांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहे. इतकेच नव्हे तर काही जणांना कायमचे अपंगत्त्व आले आहे. शेडगाव चौरस्ता परिसर हा धोक्याचा असून येथे सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, जिल्हा प्रशासनही उड्डाण पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या नेतृत्त्वात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी काही प्रमाणात कामही झाले. परंतु, ते अपुरेच पडत आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.