शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ट्रॅव्हल्सची बसला धडक ११ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:25 IST

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देशेडगाव शिवारातील घटना : जखमीत विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, रापमच्या वर्धा आगाराची एम.एच. १४ बी.टी. १२५२ क्रमांकाची बस वर्धेकडून समुद्रपूरच्या दिशेने जात होती. ही बस शेडगाव चौरस्ता परिसरात रस्ता ओलांडत असताना चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या एम. एच. ३४ ए.व्ही. १२७७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने या बसला जबर धडक दिली.या अपघातात समुद्रपूर येथील शाळेत जात असलेल्या अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगता, अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे सर्व रा. मांडगाव तसेच लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार दोन्ही रा. भुगाव आणि नागपूर येथील रामा विनायक बांधेकर हे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत कºहाडे, बंडु डडमल, दिनेश धवने, नागेश तिवारी, किशोर येळणे, देवेंद्र पुरी, चंदु बन्सोड यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतली. शिवाय जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.वाहतूक खोळंबलीभरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अकरा जण जखमी झाले. अपघातानंतर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्याकडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.शेडगाव चौरस्ता धोक्याचाचशेडगाव चौरस्ता परिसरात यापूर्वीही अनेक अनघात झाले असून शेकडो जणांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहे. इतकेच नव्हे तर काही जणांना कायमचे अपंगत्त्व आले आहे. शेडगाव चौरस्ता परिसर हा धोक्याचा असून येथे सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, जिल्हा प्रशासनही उड्डाण पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या नेतृत्त्वात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी काही प्रमाणात कामही झाले. परंतु, ते अपुरेच पडत आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.