शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ट्रॅव्हल्सची बसला धडक ११ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:25 IST

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देशेडगाव शिवारातील घटना : जखमीत विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, रापमच्या वर्धा आगाराची एम.एच. १४ बी.टी. १२५२ क्रमांकाची बस वर्धेकडून समुद्रपूरच्या दिशेने जात होती. ही बस शेडगाव चौरस्ता परिसरात रस्ता ओलांडत असताना चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या एम. एच. ३४ ए.व्ही. १२७७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने या बसला जबर धडक दिली.या अपघातात समुद्रपूर येथील शाळेत जात असलेल्या अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगता, अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे सर्व रा. मांडगाव तसेच लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार दोन्ही रा. भुगाव आणि नागपूर येथील रामा विनायक बांधेकर हे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत कºहाडे, बंडु डडमल, दिनेश धवने, नागेश तिवारी, किशोर येळणे, देवेंद्र पुरी, चंदु बन्सोड यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतली. शिवाय जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.वाहतूक खोळंबलीभरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अकरा जण जखमी झाले. अपघातानंतर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्याकडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.शेडगाव चौरस्ता धोक्याचाचशेडगाव चौरस्ता परिसरात यापूर्वीही अनेक अनघात झाले असून शेकडो जणांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहे. इतकेच नव्हे तर काही जणांना कायमचे अपंगत्त्व आले आहे. शेडगाव चौरस्ता परिसर हा धोक्याचा असून येथे सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, जिल्हा प्रशासनही उड्डाण पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या नेतृत्त्वात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी काही प्रमाणात कामही झाले. परंतु, ते अपुरेच पडत आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.