शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
2
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
3
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
4
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
5
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
6
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
7
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
8
Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
9
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
10
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
11
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
12
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
13
"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत
14
IND vs AUS : Adam Zampa नं मारलेला 'चौकार' गंभीरचा 'सुंदर' डाव फसवा ठरवणारा?
15
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
16
Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ
17
बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)
18
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
19
जगातील 'या' देशांत १ लाख रुपये कमवाल तर भारतात येऊन मालमाल व्हाल! तुम्हाला माहीत आहे का?
20
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स

ट्रॅव्हल्सची बसला धडक ११ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:25 IST

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देशेडगाव शिवारातील घटना : जखमीत विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्ता परिसरात भरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिली. या अपघातात अकरा प्रवासी जखमी झाले असून त्यात नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, रापमच्या वर्धा आगाराची एम.एच. १४ बी.टी. १२५२ क्रमांकाची बस वर्धेकडून समुद्रपूरच्या दिशेने जात होती. ही बस शेडगाव चौरस्ता परिसरात रस्ता ओलांडत असताना चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या एम. एच. ३४ ए.व्ही. १२७७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने या बसला जबर धडक दिली.या अपघातात समुद्रपूर येथील शाळेत जात असलेल्या अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगता, अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे सर्व रा. मांडगाव तसेच लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार दोन्ही रा. भुगाव आणि नागपूर येथील रामा विनायक बांधेकर हे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच जाम पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत कºहाडे, बंडु डडमल, दिनेश धवने, नागेश तिवारी, किशोर येळणे, देवेंद्र पुरी, चंदु बन्सोड यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतली. शिवाय जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.वाहतूक खोळंबलीभरधाव ट्रॅव्हल्सने रापमच्या बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अकरा जण जखमी झाले. अपघातानंतर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्याकडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.शेडगाव चौरस्ता धोक्याचाचशेडगाव चौरस्ता परिसरात यापूर्वीही अनेक अनघात झाले असून शेकडो जणांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहे. इतकेच नव्हे तर काही जणांना कायमचे अपंगत्त्व आले आहे. शेडगाव चौरस्ता परिसर हा धोक्याचा असून येथे सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु, जिल्हा प्रशासनही उड्डाण पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या नेतृत्त्वात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी काही प्रमाणात कामही झाले. परंतु, ते अपुरेच पडत आहे. त्यामुळे नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.