शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अर्ध्यावरच लागतो बसला ब्रेक

By admin | Updated: April 23, 2015 01:54 IST

प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ ...

वर्धा : प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ शिवाय बहुतांश बसेस नादुरूस्त असल्याने त्या मधेच फेल पडतात़ यामुळे प्रवाश्यांना दुसऱ्या वाहनांनी गंतव्य स्थळ गाठावे लागते़ परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़समुद्रपूर ते वर्धा दरम्यानचा प्रवास प्रवाश्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे़ रविवारी बसफेऱ्या कमी होतात तर नादुरूस्त बसेसचा फटका प्रवाश्यांना सहन करावा लागतो़ याबाबत वर्धा बसस्थानकावर असलेल्या चौकशी कक्षात विचारणा केल्यास समुद्रपूर ये-जा करण्याकरिता प्रत्येक पाच मिनिटांनी बसफेरी असल्याचे सांगितले जाते़ काही बसेस फेल आहेत वा काही फेऱ्या कमी करण्यात आल्याचेही सांगितले जाते़ वर्धा ते समुद्रपूर मार्गावर बरेच थांबे आहेत. यामुळे वाहकांनी स्वत:च्या जागेवर बसूनच तिकीटे देणे गरजेचे आहे; पण तसे होत नाही़ थांबा जवळ येत असताना वाहक तिकीटे देण्यात व्यस्त असतात़ दरम्यान प्रवासी घेणे वा उतरविताना त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असते़ वर्धा ते समुद्रपूर मार्गावरील बसेस नेहमी मधेच फेल होतात़ हा प्रकार प्रवाश्यांना त्रास देणाराच ठरत आहे़ वाहक व चालकांनी बस सुस्थितीत आहे काय, हे तपासूनच बस समोरच्या प्रवासाकरिता काढणे गरजेचे आहे; पण वाहक व चालक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात़ परिणामी, प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो़ काही बसचालक स्वत:च्या मर्जीनुसार समुद्रपूरपर्यंत जाणारी बस असताना जाम बसस्थानकावरून वर्धेकडे वळवितात़ बसचा प्रवास सुरक्षित प्रवास, हात दाखवा बस थांबवा, हे परिवहन महामंडळाचे ब्रिद वाचण्यापुरतेच मर्यादित झाल्याचे दिसते़ समुद्रपूर बसस्थानकावरून दुपारच्या वेळी बसेस नसतात, याचा अनुभव प्रवाश्यांनी फेबु्रवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात घेतला़ दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत, बसेस उपलब्ध राहत नसून थेट साडेतीन वाजता बस उपलब्ध होते़ याबाबत वर्धा चौकशी विभागास विचारणा केल्यास कर्मचाऱ्यांद्वारे बेजबाबदार उत्तरे दिली जातात़ या प्रकारामुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत़ प्रवाश्यांच्या सोयीकरिता सेवाग्राम मार्गे समुद्रपूरपर्यंत बसफेऱ्या वाढविणे गरजेचे झाले आहे़ शिवाय त्या बसफेऱ्या वेळेवर असणेही गरजेचे आहे़ परिवहन महामंडळाने प्रवाश्यांचे समाधान केल्यास एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा, प्रवाशांचे प्रश्न समजून घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी विभाग नियंत्रक गव्हाळे यांना निवेदनही सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)