शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

अर्ध्यावरच लागतो बसला ब्रेक

By admin | Updated: April 23, 2015 01:54 IST

प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ ...

वर्धा : प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ शिवाय बहुतांश बसेस नादुरूस्त असल्याने त्या मधेच फेल पडतात़ यामुळे प्रवाश्यांना दुसऱ्या वाहनांनी गंतव्य स्थळ गाठावे लागते़ परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़समुद्रपूर ते वर्धा दरम्यानचा प्रवास प्रवाश्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे़ रविवारी बसफेऱ्या कमी होतात तर नादुरूस्त बसेसचा फटका प्रवाश्यांना सहन करावा लागतो़ याबाबत वर्धा बसस्थानकावर असलेल्या चौकशी कक्षात विचारणा केल्यास समुद्रपूर ये-जा करण्याकरिता प्रत्येक पाच मिनिटांनी बसफेरी असल्याचे सांगितले जाते़ काही बसेस फेल आहेत वा काही फेऱ्या कमी करण्यात आल्याचेही सांगितले जाते़ वर्धा ते समुद्रपूर मार्गावर बरेच थांबे आहेत. यामुळे वाहकांनी स्वत:च्या जागेवर बसूनच तिकीटे देणे गरजेचे आहे; पण तसे होत नाही़ थांबा जवळ येत असताना वाहक तिकीटे देण्यात व्यस्त असतात़ दरम्यान प्रवासी घेणे वा उतरविताना त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असते़ वर्धा ते समुद्रपूर मार्गावरील बसेस नेहमी मधेच फेल होतात़ हा प्रकार प्रवाश्यांना त्रास देणाराच ठरत आहे़ वाहक व चालकांनी बस सुस्थितीत आहे काय, हे तपासूनच बस समोरच्या प्रवासाकरिता काढणे गरजेचे आहे; पण वाहक व चालक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात़ परिणामी, प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो़ काही बसचालक स्वत:च्या मर्जीनुसार समुद्रपूरपर्यंत जाणारी बस असताना जाम बसस्थानकावरून वर्धेकडे वळवितात़ बसचा प्रवास सुरक्षित प्रवास, हात दाखवा बस थांबवा, हे परिवहन महामंडळाचे ब्रिद वाचण्यापुरतेच मर्यादित झाल्याचे दिसते़ समुद्रपूर बसस्थानकावरून दुपारच्या वेळी बसेस नसतात, याचा अनुभव प्रवाश्यांनी फेबु्रवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात घेतला़ दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत, बसेस उपलब्ध राहत नसून थेट साडेतीन वाजता बस उपलब्ध होते़ याबाबत वर्धा चौकशी विभागास विचारणा केल्यास कर्मचाऱ्यांद्वारे बेजबाबदार उत्तरे दिली जातात़ या प्रकारामुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत़ प्रवाश्यांच्या सोयीकरिता सेवाग्राम मार्गे समुद्रपूरपर्यंत बसफेऱ्या वाढविणे गरजेचे झाले आहे़ शिवाय त्या बसफेऱ्या वेळेवर असणेही गरजेचे आहे़ परिवहन महामंडळाने प्रवाश्यांचे समाधान केल्यास एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा, प्रवाशांचे प्रश्न समजून घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी विभाग नियंत्रक गव्हाळे यांना निवेदनही सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)