शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

अर्ध्यावरच लागतो बसला ब्रेक

By admin | Updated: April 23, 2015 01:54 IST

प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ ...

वर्धा : प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ शिवाय बहुतांश बसेस नादुरूस्त असल्याने त्या मधेच फेल पडतात़ यामुळे प्रवाश्यांना दुसऱ्या वाहनांनी गंतव्य स्थळ गाठावे लागते़ परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़समुद्रपूर ते वर्धा दरम्यानचा प्रवास प्रवाश्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे़ रविवारी बसफेऱ्या कमी होतात तर नादुरूस्त बसेसचा फटका प्रवाश्यांना सहन करावा लागतो़ याबाबत वर्धा बसस्थानकावर असलेल्या चौकशी कक्षात विचारणा केल्यास समुद्रपूर ये-जा करण्याकरिता प्रत्येक पाच मिनिटांनी बसफेरी असल्याचे सांगितले जाते़ काही बसेस फेल आहेत वा काही फेऱ्या कमी करण्यात आल्याचेही सांगितले जाते़ वर्धा ते समुद्रपूर मार्गावर बरेच थांबे आहेत. यामुळे वाहकांनी स्वत:च्या जागेवर बसूनच तिकीटे देणे गरजेचे आहे; पण तसे होत नाही़ थांबा जवळ येत असताना वाहक तिकीटे देण्यात व्यस्त असतात़ दरम्यान प्रवासी घेणे वा उतरविताना त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असते़ वर्धा ते समुद्रपूर मार्गावरील बसेस नेहमी मधेच फेल होतात़ हा प्रकार प्रवाश्यांना त्रास देणाराच ठरत आहे़ वाहक व चालकांनी बस सुस्थितीत आहे काय, हे तपासूनच बस समोरच्या प्रवासाकरिता काढणे गरजेचे आहे; पण वाहक व चालक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात़ परिणामी, प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो़ काही बसचालक स्वत:च्या मर्जीनुसार समुद्रपूरपर्यंत जाणारी बस असताना जाम बसस्थानकावरून वर्धेकडे वळवितात़ बसचा प्रवास सुरक्षित प्रवास, हात दाखवा बस थांबवा, हे परिवहन महामंडळाचे ब्रिद वाचण्यापुरतेच मर्यादित झाल्याचे दिसते़ समुद्रपूर बसस्थानकावरून दुपारच्या वेळी बसेस नसतात, याचा अनुभव प्रवाश्यांनी फेबु्रवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात घेतला़ दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत, बसेस उपलब्ध राहत नसून थेट साडेतीन वाजता बस उपलब्ध होते़ याबाबत वर्धा चौकशी विभागास विचारणा केल्यास कर्मचाऱ्यांद्वारे बेजबाबदार उत्तरे दिली जातात़ या प्रकारामुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त झाले आहेत़ प्रवाश्यांच्या सोयीकरिता सेवाग्राम मार्गे समुद्रपूरपर्यंत बसफेऱ्या वाढविणे गरजेचे झाले आहे़ शिवाय त्या बसफेऱ्या वेळेवर असणेही गरजेचे आहे़ परिवहन महामंडळाने प्रवाश्यांचे समाधान केल्यास एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा, प्रवाशांचे प्रश्न समजून घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी बापू युवा संघटनचे सुरेश पट्टेवार यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी विभाग नियंत्रक गव्हाळे यांना निवेदनही सादर केले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)